शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

जीवनदायीनी वैनगंगा दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:44 IST

जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : नदी स्वच्छतेसाठी कोण घेणार पुढाकार?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाणी व जलजन्य वनस्पतींमुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी कोण पुढाकार घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.वैनगंगा नदीच्या काठावर गोसेखुर्द सिंचन प्रकल्प बनविण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे आतपर्यंत शुद्ध असलेल्या पाण्याने रंग बदलला आहे. याचा परिणाम भंडारावासियांना जाणवू लागला आहे.आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे म्हटले आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने ही समस्या गंभीरतेने घेतलेली नाही. नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे.परिणामी दूषित पाणी वाहून जात नाही. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत.याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला मुख्य कारण वैनगंगा नदीचे दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे ईकॉर्नियाची समस्येमुळे त्यात अधिक भर पडली आहे.भंडारा, पवनी तालुक्यातील गावे प्रभवैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे प्रभावित झालेल्या नदी काठावरील गावांची निवड शुद्ध पाणीपुरवठ्याकरीता करण्यात आली आहे.भंडारा व पवनी तालुक्यातील या गावांमधील पाण्याचे नमुने फार पूर्वी तपासणीसाठी पाठविण्यातही आले होते. त्यात नदीचे पाणी दूषित असल्यामुळे ते पिण्यायोग्य नसल्याचे सांगून जलशुद्धीकरणानंतर पाण्याचा पुरवठा केला पाहिजे, असेही अहवालात नमूद आहे.मत्स्योत्पादनही घटलेवैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी केवळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. माशांची प्रजननक्षमता घटल्यामुळे त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झाला असल्याचे दिसून येते.

टॅग्स :riverनदी