शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

लग्नकार्यात 'होऊ द्या खर्चाची' मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:12 IST

सध्या लग्नसराई सुरू असून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी लॉन्स आणि मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी होऊ द्या खर्च, अशी मानसिकता ग्रामीण भागात होऊ लागली आहे. मोकळ्या वावरात किंवा घराच्या समोर भलामोठा मांडव टाकून लग्न उरकण्याची प्रथा आता मागे पडली आहे.

ठळक मुद्देअन्नाची नासाडी : ग्रामीण भागातही येतोय शहरी ट्रेंड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या लग्नसराई सुरू असून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी लॉन्स आणि मंगल कार्यालये हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी होऊ द्या खर्च, अशी मानसिकता ग्रामीण भागात होऊ लागली आहे. मोकळ्या वावरात किंवा घराच्या समोर भलामोठा मांडव टाकून लग्न उरकण्याची प्रथा आता मागे पडली आहे. मांडवांची जागा लॉन्स आणि मंगल कार्यालयांनी घेतली आहे. मात्र सर्वसामान्यांची लग्न अजूनही मांडवातच होतात. जेवणासाठी पंगतीबरोबरच काही ठिकाणी बुफे पद्धत अवलंबली जावू लागल्यामुळे अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. या उन्नतीचा बहुतांश नागरिकांना विसर पडत आहे. परिणामी अन्नाच्या नासाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.उन्हाची तमा न बाळगता बँडपथकाच्या तालावर बेधुंद नाचणाऱ्या तरूणाईला आळा घालून लग्न वेळेवर लावावे, व अन्नाची नासाडी बंद करावी याकरिता वधूपक्षाकडील मंडळी वरपक्षाची मनधरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे.बदलत्या वातवरणामुळे वºहाडी मंडळीची धावपळ आधुनिक युगात लग्नसोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. हुंडापद्धत बंद झाली असली तरी संसारोपयोगी वस्तू दागिने, महागड्या साड्या, पंचपक्वानाची पंगत आदी सगळे वधूपित्यास हायटेक पद्धतीने करावे लागते.आजच्या आधुनिक युगामध्ये सर्वच बाबतीत चंगळवाद वाढत असून, लग्नसोहळे याला अपवाद राहिलेले नाहीत. ग्रामीण भागात लग्नसोहळ्यातील बुंदी, वरण भात अन उसळ हे पारंपारिक पदार्थ मागे पडले असून अलीकडे गोड खाद्यपदार्थादेखील एकापेक्षा अधिक निवडले जाऊ लागले आहेत. तसेच साधा भात अन् वरण याबरोबरच मसाला भाताचाही समावेश होऊ लागला आहे.ग्रामीण भागांमध्ये एकाचेवळी चार चार लग्न होत असल्याने विवाहांना हजेरी लावणारी मंडळी जेवण करणे टाळू लागली आहे. परिणामी वधू-पित्याने पाहुण्यांसाठी तयार केलेल्या अन्नाची नासाडी होते. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात वºहाडीमंडळी येतील, अशा अपेक्षेने वधू-पक्ष जेवण तयार करतो, परंतु एकाच दिवशी आठ ते दहा लग्नपत्रिका आलेल्या असतात. पावसाने मोठ्या प्रमाणात कहरच केला आहे.ढगाळ वातावरण सकाळी ८ वाजेपासून जाणवणारा उकाडा. उष्णतेमुळे स्वयंपाक वाया जाईल, म्हणून आता मोठ्या प्रमाणात लग्नाआधीच जेवणाचा कार्यक्रम सुरू केला जातो. जेवणाचा मेनुसुद्धा बदलणे आवश्यक आहे. आता सध्या सर्वत्र वरण भात मसाले भात, पुरी भाजी, जिलेबी, बुंदी लाडू, गुलाबजामू पदार्थ लग्न सोहळ्यामध्ये दिसतात. स्वयंपाकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसून येते.गरजेपेक्षा अधिक घेतले जाते अन्नशहरी भागात लग्नसोहळ्यांपासून पंगत पद्धत हद्दपार झाली असून बहुतांश समारंभात बुफे पद्धतीला पसंती दिली जात आहे. मात्र बुफे पद्धत ही अन्न नासाडीला सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. यामुळे जेवण ताटात वाढून घेण्यासाठी रांग लावावी लागते. परिणामी नागरिकांदेखील वारंवार रांगेत उभे राहण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे एकदाच खाद्यपदार्थ गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ताटामध्ये वाढून घेत जेवढे खाल्ले गेले तेवढे खायचे उरलेले ताटात तसेच सोडून देण्याचा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. अनेकदा या पद्धतीत जेवण वाढून घेण्याचा नागरिकांचा पूर्व अंदाजही मोडकळीस येतो. ग्रामीण भागातील वºहाड असेल, तर बुफे पद्धत अन्नाचा कर्दनकाळच ठरते. सुशिक्षित वºहाडी असले तर काही प्रमाणात बुफे पद्धतीत अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होते.