शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा बांधू द्या, त्यानंतर फोडा! अधिकाऱ्याचे सुतोवाच

By admin | Updated: February 15, 2015 00:32 IST

साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे.

भंडारा : साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे. येथील शेती बुडीत क्षेत्रात येत असतानाही तिथे लघु पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच पैसे घेऊन गप्प रहा, नाही तर बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यावर त्याला फोडा. असे सुतोवाच केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ बंधाऱ्याबाबत कैफियत मांडली.शासनाने शेतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी सर्वत्र बंधारे बांधकाम करण्यावर भर दिला आहे. याच अनुशंगाने, जिल्ह्यातील शेतींना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी धरण व बंधाऱ्यांचे कामे करण्यात येत आहे. मार्च एंडिंग असल्याने आता प्रत्येक विभागातील शिल्लक निधी परत जाण्याची भीती असल्याने विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी निधीच्या उपयोगातून कामावर खर्च करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचा करार ग्रामपंचायतीच्या नावाने असला तरी हे काम कंत्राटदाराकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. या क्षेत्रातील शेती नाल्याच्या पाण्यामुळे अगोदरच बुडीत क्षेत्रात येते. शेती बुडीत प्रकरणाचे शेतकऱ्यांना पैसेही मिळालेले आहे. असे असताना बांधण्यात येत असलेला बंधाऱ्याचे काम चुकीचे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बांधकामाला विरोध केला. बांधकाम करण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काम करण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला असतानाही जेसीबीच्या माध्यमातून नाल्याचे सपाटीकरण करून पाण्याला थोप बसावी, यासाठी मातीकाम करण्यात आले. याबाबत लघु पाटबंधाारे विभागाचे साकोली उपविभागाचे अभियंता धुर्वे यांनी शेतकऱ्यांना आधी बंधारा बांधू द्या, कंत्राटदाराचे पैसे निघाल्यावर तोडून टाका, असा सल्ला दिल्याचा उदय जगदीश बोरकर या शेतकऱ्याने ‘लोकमत’जवळ सांगितले. या बंधाऱ्यामुळे शासकीय पैशाचा दुरूपयोग होत असून हे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी दयाराम रूरखमोडे, हरिदास रूखमोडे, केवळराम रूखमोडे, उदय बोरकर, हरीभाऊ रूखमोडे, जागेश्वर रूखमोडे आदी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)