शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बंधारा बांधू द्या, त्यानंतर फोडा! अधिकाऱ्याचे सुतोवाच

By admin | Updated: February 15, 2015 00:32 IST

साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे.

भंडारा : साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर बांधण्यात येत असलेला बंधारा हा 'हरितक्रांती' कार्यक्रमाला फार्स ठरणारा आहे. येथील शेती बुडीत क्षेत्रात येत असतानाही तिथे लघु पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्याचे बांधकाम होत आहे. याला शेतकऱ्यांनी विरोध केला असता, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनाच पैसे घेऊन गप्प रहा, नाही तर बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यावर त्याला फोडा. असे सुतोवाच केल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ बंधाऱ्याबाबत कैफियत मांडली.शासनाने शेतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी सर्वत्र बंधारे बांधकाम करण्यावर भर दिला आहे. याच अनुशंगाने, जिल्ह्यातील शेतींना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी धरण व बंधाऱ्यांचे कामे करण्यात येत आहे. मार्च एंडिंग असल्याने आता प्रत्येक विभागातील शिल्लक निधी परत जाण्याची भीती असल्याने विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी निधीच्या उपयोगातून कामावर खर्च करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.साकोली तालुक्यातील शिवनिबांध नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचा करार ग्रामपंचायतीच्या नावाने असला तरी हे काम कंत्राटदाराकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. या क्षेत्रातील शेती नाल्याच्या पाण्यामुळे अगोदरच बुडीत क्षेत्रात येते. शेती बुडीत प्रकरणाचे शेतकऱ्यांना पैसेही मिळालेले आहे. असे असताना बांधण्यात येत असलेला बंधाऱ्याचे काम चुकीचे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी बांधकामाला विरोध केला. बांधकाम करण्यापूर्वी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच काम करण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला असतानाही जेसीबीच्या माध्यमातून नाल्याचे सपाटीकरण करून पाण्याला थोप बसावी, यासाठी मातीकाम करण्यात आले. याबाबत लघु पाटबंधाारे विभागाचे साकोली उपविभागाचे अभियंता धुर्वे यांनी शेतकऱ्यांना आधी बंधारा बांधू द्या, कंत्राटदाराचे पैसे निघाल्यावर तोडून टाका, असा सल्ला दिल्याचा उदय जगदीश बोरकर या शेतकऱ्याने ‘लोकमत’जवळ सांगितले. या बंधाऱ्यामुळे शासकीय पैशाचा दुरूपयोग होत असून हे काम त्वरीत थांबवावे, अशी मागणी दयाराम रूरखमोडे, हरिदास रूखमोडे, केवळराम रूखमोडे, उदय बोरकर, हरीभाऊ रूखमोडे, जागेश्वर रूखमोडे आदी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)