शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन लाखनी तालुक्यासाठी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती ...

लाखनीः राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पापासून डाव्या कालव्यातून नवीन नहराचे नियोजन केल्यामुळे तसेच करचखेडा उपसासिंचन प्रकल्पापासून धान शेती साठी नवीन कालवे तयार केल्याने लाखनी तालुक्यातील ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती शेत्र व साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेतीमध्ये सिंचन व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचविता येणार आहे. बारमाही पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यात मदत होणार असल्याचे निवेदन जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष रणवीर भगत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, आदींना दिले आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो उत्पन्न घेण्यास अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेती पिकवण्यास अडचणी येतात विंधन विहिरी मुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी,खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुला मुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची घटना घडतांनी दिसून येत असल्याचे रणवीर भगत यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.

लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक), ह्या तलाठी साझ्यातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन नहराद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन नहराचा लाभ होऊ शकतो असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे. तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणी पुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.