शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

उत्पन्न सोडाच; उत्पादन खर्चाचेही वावडे!

By admin | Updated: December 11, 2014 23:00 IST

मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे.

अमरावती : मागील वर्षी अतिपाऊस, परतीचा पाऊस तसेच गारपिटीमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. यावर्षी अल्पशा पावसामुळे व निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन गारद झाले. सलग तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे. प्रमुख पिकांच्या लागवडीसह फवारणी व काढणीपर्यंतचा अर्धा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याचे दुर्दैवी चित्र यावर्षी पहायला मिळत आहे. मागील दशकापासून जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढले आहे. विशेषत: रोखीचे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले. खरिपाच्या सरासरी लागवड क्षेत्रापेक्षा ५० टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी लागवडक्षेत्र ७ लाख १४ हजार हेक्टर असताना ३ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे; तथापि पेरणीनंतर जून महिन्यापासून दीड महिना पावसाची दडी, त्यानंतर पावसात खंड व निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. मागील दोन, तीन वर्षांचा सोयाबीन पिकाचा ताळेबंद पाहिला असता उत्पादन खर्चाच्या अर्धेदेखील उत्पन्न झालेले नाही.बँकांचे पीककर्ज, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली होती. पेरणी पाठोपाठ डीएपी खते, तणनाशके, कीटकनाशकांच्या तीन फवारण्या, निंदण, खुरपण, मशागत ते काढणीपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांनी केला. प्रतिएकर खर्चाच्या तुलनेत सोयाबीनचा उतारा व प्रतीक्विंटल मिळणाऱ्या भावाचा ताळेबंद पाहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला निम्मे खर्चही पदरात पडला नाही. आणेवारीदेखील ४६ पैसेच आहे. म्हणजेच जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.