शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बंडखोरी रोखताना नेत्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:42 IST

तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज छाणनीत अवैध ठरविण्यात आले. आता ६६ उमेदवार कायम आहेत. त्यात तुमसर १५, भंडारा २५ आणि साकोलीतील २६ उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर आणि भंडारा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांकडून प्रयत्न : आज नामांकन मागे घेण्याचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वपक्षियांनी केलेली बंडखोरी मोडीत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी गत तीन दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. मात्र बंडखोरांना थंड करताना नेत्यांची दमछाक होत असल्याचे तुमसर आणि भंडारा विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. सोमवार हा नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कोण नामांकन मागे घेणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज छाणनीत अवैध ठरविण्यात आले. आता ६६ उमेदवार कायम आहेत. त्यात तुमसर १५, भंडारा २५ आणि साकोलीतील २६ उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर आणि भंडारा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांचे बंड रोखण्यासाठी वरिष्ठ छाननीच्या दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप त्यांना यश आल्याचे दिसत नाही.भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या तिनही आमदारांचे तिकीट पक्षाने कापले. ऐनवेळेवर तिकीट कापल्याने या आमदारांनी आपल्या मतदारसंघात नामांकन दाखल केले. तुमसर आणि भंडाराच्या आमदारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. तर साकोलीचे आमदार राजेश काशीवार यांनी भाजपतर्फे नामांकन दाखल केले होते. छाननीत एबी फार्म अवैध ठरविण्यात आला. मात्र तुमसर आणि भंडारात बंडखोरी कायम आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी तिकीट कापले. त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपच्या अधिकृत उमेदवारासाठी आमदार वाघमारे धोक्याची घंटा ठरु शकतात. त्यामुळे त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु आहे. रविवारी रात्रीपर्यंत तरी त्यात यश आले नव्हते.यासोबतच तुमसर विधानसभा मतदार संघात माजी आमदार अनिल बावनकर, राष्टÑवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी नामांकन दाखल केले आहे. त्यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. परिणामी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. तसेच काँग्रेसच्या वाट्याची जागा राष्टÑवादीला गेल्याने डॉ. पंकज कारेमोरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. आता राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून या बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भंडारा विधानसभेत आमदार रामचंद्र अवसरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी भाजपच्या उमेदवारासाठी धोक्याची ठरु शकते. त्यांनी नामांकन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न सुरु आहे.तीन मतदार संघात ६६ उमेदवारी अर्ज कायम राहिले त्यात अनेक अपक्षांचा समावेश आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी अपक्ष उमेदवार अडचणीचे ठरु शकतात. थोडीथोडी मते या अपक्षांनी घेतली तरी अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडू शकते. त्यामुळे अपक्षांना या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी युती आणि आघाडीकडून तिनही मतदारसंघात प्रयत्न सुरु आहे. बंडखोरांची बंडखोरी शांत करण्यासाठी नेत्यांची मोठी दमछाक होत आहे. विविध माध्यमातून बंडखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांना आमिष देवून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.बंडखोर आणि अपक्ष नॉट रिचेबलनामांकन मागे घेण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असल्याने दोनही मतदार संघातील बंडखोर आणि अपक्ष रविवारी नॉटरिचेबल होते. वरिष्ठ नेत्यांनी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यातील अनेकांचे मोबाईल स्विच आॅफ दिसत होते. काही बंडखोरांच्या आणि अपक्षांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचा नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र बहुतांश बंडखोरांची भेटच होऊ शकली नाही. आता रविवारच्या रात्रीतून नेतेमंडळी काय करतात आणि सोमवारी कोण आपली उमेदवारी मागे घेतो यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा करवी लागणार आहे.