शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

कायदा सुव्यवस्था ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:21 IST

जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत मागील काही महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत आरोप : प्रकरण साकोली, तुमसर व भंडारा शहरातील खुनाचे, आरोपी मोकाट आणि निर्दोषांवर कारवाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत मागील काही महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. अनेक प्रकरणात आरोपींना अभय देणाºया पोलीस अधिकाऱ्यांनी अन्यायग्रस्त कुटुंबावर दडपण टाकण्याचा प्रकार अवलंबिला आहे. भंडारा शहरात आठवडाभरापूर्वी तर साकोली येथे महिनाभरापूर्वी व तुमसर येथे दोन महिन्यापूर्वी तर बेला येथे रविवारला रात्री खून झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला.भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, अखिल भारतीय माळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर, यांनी हा आरोप केला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढल्या आहेत. यावर अंकुश लावण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरली आहेत. अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्यापेक्षा या कुटुंबावरच पोलिसांचा दबाव टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबाला न्यायापासून वंचित राहावे लागणार असून स्वत:चे अपयश लपविण्यासाठी पोलिसांनी दोषींना पाठीशी घालून निर्दोषांवर आरोप लावून अटकेची कारवाई करण्याचा घ्रृणास्पद प्रकार केल्याचाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.साकोली येथील सुशील बनकर, तुमसर येथील विक्की गोपलानी तर भंडारा शहरातील निहाल शेलारे या तरुणाच्या खुनातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप पत्रपरिषदेतून केला आहे. पत्रपरिषदेला काँग्रेस कमेटीचे तुमसर तालुकाध्यक्ष शंकर राऊत, प्रकाश अटाळकर यांच्यासह अन्यायग्रस्त कुटुंबिय उपस्थित होते.साकोलीचे बनकर कुटुंबीयसाकोली येथील सुशिल बनकर यांचा नोव्हेंबर महिन्याच्या ८ तारखेला मुंडीपार गावाजवळ भंडाºयाकडे येत असताना संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळ लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत येते. या प्रकरणात सुशील यांचा नियोजनबद्ध पद्धतीने खून करून मृतदेह घटनास्थळावर ठेवण्यात आले. यात पोलिसांनी अपघात घडल्याचे सांगितले असले तरी अपघातग्रस्त वाहन मात्र सुस्थितीत आहे. दरम्यान मृतक सुशीलच्या शरीरावर छातीजवळ खोल छिद्र असल्याने त्यांचा त्रयस्थ ठिकाणी खून करून मृतदेह अन्यत्र फेकल्याचा संशय यावरून येते. हा घातपात पैशाच्या वादातून झाल्याचा आरोप बनकर कुटुंबियांनी केला आहे. बनकर कुटुंबियांनी पोलिसांना संशयीत आरोपींचे नाव दिले असता पोलिसांनी त्यांना पाठीशी घालण्याकरिता बनकर कुटुंबियांचे नावे आरोपींना सांगून गोपनीयतेचा भंग करण्याचा संतापजनक प्रकार पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात लाखनी पोलिसांकडून तपास काढावा अशी मागणी सुनिल बनकर, मृतकाची पत्नी मनिषा बनकर व बनकर कुटुंबियांनी केली.तुमसरचे कांबळे कुटुंबीयतुमसर तालुक्यातील बोरी मार्गावर गोंदिया येथील व्यावसायीक विक्की गोपलानी यांची १७ आॅगस्टला हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुकेश कांबळे व हितेंद्र बेंदवार यांच्यावर खोटे आरोप लावून प्रकरणाशी संबंध नसतानाही आरोपी बनविले आहे. मृतकाच्या कुटुंबियाशी अगदी सलोख्याचे संबंध असताना पोलिसांना यातील मुख्य आरोपीचा शोध लावण्यात विलंब लावत असल्याने त्यांनी मुलगा व जावई यांना आरोपी केल्याचा आरोप बोरी येथील सुधाकर कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून खºया आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला सुधाकर कांबळे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.कोटगाव येथील सेलारे कुटुंबभंडारा तालुक्यातील कोटगाव (खरबी नाका) येथील निहाल सेलारे या १९ वर्षीय युवकाचा भंडारा शहरात ११ डिसेंबरला खून करण्यात आला. तो गावातीलच एका १७ वर्षीय तरुणीसह भंडारा शहरात भाड्याच्या घरी राहत होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केलेली नसल्याचा आरोप मृतक निंहालचे वडील रमेश सेलारे यांनी केला आहे. ज्या तरुणीसह मृतक निहाल हा भंडाºयात राहत होता तिच्या आईला व बहिणीला या प्रकरणाची सविस्तर माहिती होती. निहालचा खून करून त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर आरोपींनी पळ काढला. दरम्यान त्यांनी मृतदेह रुग्णालयात आणला असताना तिथे मृतकाचे नातेवाईक असल्याचे कागदोपत्री नमूद केले. वास्तविकतेत मृतकासह त्याचे नातेवाईक नव्हते. त्यामुळे सध्या हे आरोपी कुटुंब गावातून पसार झालेले आहेत. सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज बघितल्यास आरोपींचा शोध लागेल. मात्र पोलीस प्रशासनाने मृतकाच्याच आईवडीलांवर दबाव आणल्याचा आरोप रमेश सेलारे व उलमा सेलारे यांनी केला आहे.