शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

२६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देवून करण्यात आला.

ठळक मुद्देगरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन : दहा रुपयात मिळणार थाळी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना २६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देवून करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड उपस्थित होते.राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु करण्यात येत आहे. प्रति दहा रुपये थाळी याप्रमाणे जेवण गरजूंसाठी उपलब्ध असणार आहे. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हावर निवड करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाचे भोजनालय व महसूल कँटिन या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे.या दोन संस्थांची निवड जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील समितीने केली असून शासन प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये ५० रुपये तर ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ १० रुपये नाममात्र रक्कम घेतली जात जाणार आहे. असे असले तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये ५० रुपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भंडारा मध्ये सद्यस्थितीत २०० थाळींचे प्रशासनाने नियोजन केले आहे.भंडारा मध्ये ही सुविधा दोन ठिकाणी सुरु करण्यात आली असून जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच मिळणार आहे.शिवभोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. भंडारा मध्ये २६ जानेवारी पासून जिल्हा परिषद,भंडारा येथे आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाचे भोजनालय व महसूल कॅटिन येथे शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक