शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर

By admin | Updated: June 8, 2015 01:08 IST

कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे.

कोंढा कोसरा : कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे. जलवाहिणी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतच्या नाकीनऊ आले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे.कोंढा हे सात ते आठ हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे. लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ३० वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. गावाला या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या दरम्यान गावांची लोकसंख्या वाढली. पाण्याची कमतरता निर्माण झाली. बोअर मारून पाणी देण्याचा प्रयत्न झाला. लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने शासनाने लाखो रुपये तसेच ग्रामपंचायतचा लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. पण पाण्याची समस्या जैसे थे आहे. (वार्ताहर)मुख्य विहीर कोरडी, तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल?भंडारा - पवनी राज्यमार्गावर गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहीर आहे. सध्या ही विहीर पूर्ण कोरडी पडली आहे.चार- पाच दिवसातून विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीवरून कोसरा गावाला देखील पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी मुख्य विहीर पूर्ण कोरडी पडली. कल्पना चावला अध्यापक विद्यालय जवळील पंप तसेच डॉ.विश्वास यांच्या घराजवळील पंप याद्वारे लोकांना पिण्याचे पाणी दिले जात होते. तरीदेखील पाण्याची समस्या सुटत नाही, असे लक्षात आल्यानंतर जीवन जिभकाटे यांच्या घराजवळ मे महिन्यात बोअर करून पंप तयार केले. तरी देखील कोंढा येथील पाणी समस्या सुटली नाही. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील नळाला पिण्याचे पाणी येतच नाही. आले तर अत्यल्प. त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मधील महिलांनी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतवर अनेकदा घागर मोर्चा काढला. पण तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल. या म्हणीप्रमाणे पाणीच नाही तर मिळेल कुठून? असा प्रश्न पडला आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने पुन्हा गावात पाणी समस्या वाढली आहे.येथील नळयोजनेची जलवाहिणी जीर्ण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फुटते. दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपये ग्रामप्रशासनाचे रुपये खर्च होत आहे. एक मोटरपंप खरेदी करण्यााठी पदाधिकारी भंडारा, नागपूर येत जात आहे. पण पिण्याच्या पाणी समस्येवर तोडगा निघू शकत नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोंढा गावाची पाणी समस्या हा मुख्य विषय राहणार आहे. सामान्य जनता मात्र पिण्याचे पाणीसाठी भटकत आहे. सध्या तीन दिवसातून पाणी मिळत आहे. ही समस्या दूर होण्याची वाट गावकरी पाहत आहे.