शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

शेवटच्या दिवशीही अंतिम पैसेवारी अघोषित

By admin | Updated: January 1, 2016 01:09 IST

सुधारित निकषाप्रमाणे खरिपाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा

भंडारा : सुधारित निकषाप्रमाणे खरिपाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र अंतिम पैसेवारीच्या अहवालावर रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा अंतिम अहवाल जाहीर झालेला नाही. ब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यावर्षी सुधारणा करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पीक पैसेवारी घोषित करण्यात येत आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला. याशिवाय केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या (एनडीआरएफ) आधारे ३३ टक्के पीक नुकसान ग्राह्य धरून ६७ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न आलेल्या कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रातील निविष्ठा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. राज्यात वारंवार निर्माण होणारी टंचाई स्थिती घोषीत करण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजनेत पैसेवारीचे निकष लागू असल्यामुळे आणेवारी पद्धतीत बदल करण्याची मागणी विधिमंडळात चर्चेच्या दरम्यान व्हायची. यासंदर्भात केंद्राच्या धोरणाप्रमाणे शिफारस करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्याच्या पीक पैसेवारीबाबतचा अभ्यास करून या समितीने शासनाला २३ जुलै २०१५ रोजी अहवाल सादर केला होता. समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ उपसमिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने समितीच्या अहवालातील काही शिफारशी स्वीकारले आहेत. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसेवारी जाहीर करणे व खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार ही पैसेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबरला जाहीर होणार होती. अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या उद्देशाने गुरूवारला सायंकाळच्या सुमारास उपजिल्हाधिकारी (महसूल) सुजाता गंधे यांच्या कक्षात विविध तालुका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित झाले होते. मात्र अंतिम आणेवारी घोषीत करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात सुजाता गंधे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (नगर प्रतिनिधी)स्वाक्षरीअभावी रखडला अहवाल !४महसूल विभागाने अंतिम पैसेवारीचा अहवाल तयार केलेला असून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊ न शकल्यामुळे अहवाल घोषित करण्यात आला नाही. परिणामी, जिल्ह्यातील किती गावे दुष्काळग्रस्त यादीत आहेत, याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती कळू शकली नाही.