शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

शेवटच्या दिवशीही अंतिम पैसेवारी अघोषित

By admin | Updated: January 1, 2016 01:09 IST

सुधारित निकषाप्रमाणे खरिपाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा

भंडारा : सुधारित निकषाप्रमाणे खरिपाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र अंतिम पैसेवारीच्या अहवालावर रात्री उशिरापर्यत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा अंतिम अहवाल जाहीर झालेला नाही. ब्रिटिशकालीन पैसेवारी काढण्याच्या पद्घतीत यावर्षी सुधारणा करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानानुसार शास्त्रोक्त पद्धतीने पीक पैसेवारी घोषित करण्यात येत आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला. याशिवाय केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या (एनडीआरएफ) आधारे ३३ टक्के पीक नुकसान ग्राह्य धरून ६७ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न आलेल्या कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रातील निविष्ठा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. राज्यात वारंवार निर्माण होणारी टंचाई स्थिती घोषीत करण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजनेत पैसेवारीचे निकष लागू असल्यामुळे आणेवारी पद्धतीत बदल करण्याची मागणी विधिमंडळात चर्चेच्या दरम्यान व्हायची. यासंदर्भात केंद्राच्या धोरणाप्रमाणे शिफारस करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्याच्या पीक पैसेवारीबाबतचा अभ्यास करून या समितीने शासनाला २३ जुलै २०१५ रोजी अहवाल सादर केला होता. समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ उपसमिती व मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने समितीच्या अहवालातील काही शिफारशी स्वीकारले आहेत. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसेवारी जाहीर करणे व खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार ही पैसेवारी १५ जानेवारीऐवजी ३१ डिसेंबरला जाहीर होणार होती. अंतिम पैसेवारी जाहीर करण्याच्या उद्देशाने गुरूवारला सायंकाळच्या सुमारास उपजिल्हाधिकारी (महसूल) सुजाता गंधे यांच्या कक्षात विविध तालुका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित झाले होते. मात्र अंतिम आणेवारी घोषीत करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात सुजाता गंधे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (नगर प्रतिनिधी)स्वाक्षरीअभावी रखडला अहवाल !४महसूल विभागाने अंतिम पैसेवारीचा अहवाल तयार केलेला असून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊ न शकल्यामुळे अहवाल घोषित करण्यात आला नाही. परिणामी, जिल्ह्यातील किती गावे दुष्काळग्रस्त यादीत आहेत, याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती कळू शकली नाही.