शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनाने शेकडो एकर शेती गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही.

मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील जीवनदायी वैनगंगा नदीने काठावरील शेकडो एकर सुपीक व गाळाची जमीन गिळंकृत केली आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नसून शासनाने अजूनपर्यंत येथे कोणतीही उपाययोजना केली नाही. येणाऱ्या काळात नदीकाठावरील शेतजमिनीसह गावांनाही धोका येथे उत्पन्न झाला आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना आता मजुरी करावी लागत आहे. कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गेल्याची नोंद : शासनदप्तरी वैनगंगा नदीपात्रात आतापर्यंत केवळ ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात समाविष्ट झाल्याची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील अनेक गावांना याचा फटका बसत आहे. शेतजमीन ही बागायती शेती आहे. लाखो रुपयांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट होतानी येथील शेतकरी डोळ्यांने बघतात. 

सुरक्षा भिंतीची गरज- जिथे नदीने पात्र बदललेले आहे व मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे किमान त्या नदीकाठावर सुरक्षा भिंत बांधण्याची गरज आहे. नदीकाठावर मोठे दगड टाकून तेथे भिंत बांधल्यास भूस्खलनाच्या धोका कमी होऊन सुपीक व गाळाची शेतजमीन वाचवता येऊ शकते, परंतु त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

रेतीउपशाचा परिणाम- तुमसर तालुक्याच्या हद्दीतील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेसुमार रेतीच्या उपसा मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे तुमसर तालुक्याच्या हद्दीतील नदीपात्र  खोल झाला आहे. तर पलीकडे तिरोडा तालुक्यातील नदीचे पात्र हे उंच आहे.  -  ऐन पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुराचे पाणी खोलगट भागातून तुमसर तालुक्याच्या हद्दीतून खळखळून वाहते. पाण्याच्या तेजप्रवाह काठावर आदळतो. नदीतील पाण्याचा प्रवाहाने पात्र बदलले काय, असे दृश्य या गावात दिसत आहे. एरवी सरळ वाहणारी नदी येथे काटकोनात वाहत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

टॅग्स :riverनदीagricultureशेती