शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरात एक महिन्यापासून धानाचे चुकारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तालुक्यात यंदाच्या खरिपात सुरु करण्यात आलेल्या १५ आधारभूत धान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखांदूर : शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तालुक्यात यंदाच्या खरिपात सुरु करण्यात आलेल्या १५ आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत धान खरेदी पूर्ण होऊन तब्बल महिनाभरापासून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामांतर्गत गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत तालुक्यात १५ आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली. या केंद्रांमध्ये खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या ५, दि विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्थेच्या ३, पंचशील भात गिरणी सहकारी संस्थेच्या १ व खासगी सहकारी संस्थेंतर्गत ६ अशा एकूण १५ आधारभूत धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

या केंद्रांतर्गत गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाची आधारभूत किंमत योजनेनुसार खरेदी करण्यात आली आहे. शासन नियमानुसार गत ३१ मार्च रोजी खरेदी केंद्रांतर्गत धान खरेदी बंद पाडण्यात आली आहे. तथापि, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे शेतकऱ्यांना चुकारे अदा न करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागातील बहुतांश शेतकरी विविध पीककर्जे घेऊन शेती करतात. यामुळे बँक अथवा सेवा सहकारी संस्थांतर्गत उचल केलेल्या कर्जाची मार्च अखेरपर्यंत परतफेड करणे आवश्यक असते. या मुदतीत शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड न झाल्यास शेतकरी थकीत कर्जदार ठरुन पुढील काळात नवीन पीककर्ज उपलब्ध होण्यास विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधारभूत केंंद्रांतर्गत गत मार्च महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. या शेतकऱ्यांमधील बहुतांशी शेतकरी हे कर्जदार असताना आधारभूत केंद्रांतर्गत धान खरेदी होऊन चुकारे अदा न केल्याने शेतकरी थकीतदार ठरत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुढील काळात नवीन पीककर्जाची उचल करताना व्याजासह जुन्या कर्जाची परतफेड करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने गावागावात कोरोबाधित रुग्ण आढळत असताना अनेक गावे प्रतिबंधितही करण्यात आली आहेत. या परिस्थितीत शासनाने कडक संचारबंदी केल्याने नागरिकांना मजुरी उपलब्ध होत नसल्याने आर्थिक संकट भेडसावत आहे. शासनाने आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे अदा न केल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.