शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लाखांदूर-साकोली राज्यमार्ग उठला प्रवाशांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:44 IST

लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाºया नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, अशी बाब लाखांदुर तालुका राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर काम शासकीय नियमानुसार करण्याची मागणी केली असून तहसीलदार यांचे मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठविण्यात आले आहे.सदर रस्त्याचे काम कुठून केव्हा सुरूवात होईल हे सांगता येत नाही. रस्त्याला मधोमध खोदकाम करण्यास सुरुवात केली जाते मात्र यात याच रस्त्यावरून वाहतूक करणाºया प्रवाशाचा कवडीचाही विचार केला जात नाही. संपूर्ण रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी स्लीप होऊन आपले हातपाय गमविण्याची वेळ येऊन ठेपली तरीमात्र कंपनी मालकाची नजर या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे अजूनही पडू नये यापेक्षा मोठे आश्चर्य कोणते असावे.लाखांदुर साकोली रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिण्यापासून सुरू असून त्यात तालुक्यातील दिघोरी ते बोरगावपर्यत रस्ता खोदकामामुळे येथून प्रवास करणाऱ्या विध्यार्थांना व ईतर प्रवाशांना खुपच. त्रास सहन करावा लागत आहे.सबंधीत कंपनी चालक पुढाकार घेतानी दिसत नाही. रस्त्याचे चौपदरीकरणाच्या नादात कुण्या गरीबाचे जीव या बांधकामात जाईल हेही नाकारता येऊ शकत नाही. तर काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा पत्करावा लागू शकतो हेही तेवढेच खरे आहे.शासन कोणतेही बांधकामाचे टेंडर काढतेवेळी नियम निकस लाऊनच कामाची जबाबदारी एखाद्या ठेकेदाराला देत असतो. काम सुरू असतांना त्या कामापासून कोणत्याही सामान्य मानसाला त्याचा त्रास होणार नाही किंवा कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याच्या येणाºया संपूर्ण खचार्ची जबाबदारी सुध्दा कंपनी मालकाला करणे गरजेचे असते. मात्र साकोली-लाखांदुर महामार्गावर अस काहीही होतानी दिसत नाही. सामान्य नागरीकांना याची जाणीव नसल्या कारणाने कोणीही पोलीसात तक्रार करण्यासही पुढाकार घेत नाही. याच कमजोरीचा फायदा घेत कंपनी चालक मनमर्जी काम चालवून नागरीकांना त्रास देतात.सबंधीत कामाकडे जिंमेदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गावरील अपघात ग्रस्तांना आर्थीक मदत मिळवून देण्याची गरज भासत आहे. रस्ता निर्मीती करून करोडो रुपये कंपनी मालक कमवून जाईल मात्र या कामासाठी गरीब नागरीकांनी आपले हातपाय गमवून आर्थिक भुर्दड का सोसावा असा प्रश्न सध्या तालुक्यातील नागरीक विचारीत आहे. विकास कामाला कुणीही विरोध करीत नाहीत मात्र विकास करतांनी त्याचा त्रास सामान्य नागरीकांना होणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस