शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

लाखांदूर-साकोली राज्यमार्ग उठला प्रवाशांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:44 IST

लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाºया नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, ....

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : लाखांदूर-साकोली मागार्चे चौपदरीकरणाचे काम ऐन पावसाळयाच्या दिवसात सुरूवात करून संपूर्ण रस्त्याभर चिखलाचे साभ्राज्य अगोदर निर्माण करून सोडले आणि पावसाळा संपताच धुराचा त्रास गावातील व प्रवास करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून दमा व घशाच्या आजाराला समोर जात आहेत, अशी बाब लाखांदुर तालुका राष्ट्रवादी पार्टी यांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर काम शासकीय नियमानुसार करण्याची मागणी केली असून तहसीलदार यांचे मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठविण्यात आले आहे.सदर रस्त्याचे काम कुठून केव्हा सुरूवात होईल हे सांगता येत नाही. रस्त्याला मधोमध खोदकाम करण्यास सुरुवात केली जाते मात्र यात याच रस्त्यावरून वाहतूक करणाºया प्रवाशाचा कवडीचाही विचार केला जात नाही. संपूर्ण रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी स्लीप होऊन आपले हातपाय गमविण्याची वेळ येऊन ठेपली तरीमात्र कंपनी मालकाची नजर या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे अजूनही पडू नये यापेक्षा मोठे आश्चर्य कोणते असावे.लाखांदुर साकोली रस्त्याचे बांधकाम गेल्या सहा महिण्यापासून सुरू असून त्यात तालुक्यातील दिघोरी ते बोरगावपर्यत रस्ता खोदकामामुळे येथून प्रवास करणाऱ्या विध्यार्थांना व ईतर प्रवाशांना खुपच. त्रास सहन करावा लागत आहे.सबंधीत कंपनी चालक पुढाकार घेतानी दिसत नाही. रस्त्याचे चौपदरीकरणाच्या नादात कुण्या गरीबाचे जीव या बांधकामात जाईल हेही नाकारता येऊ शकत नाही. तर काहींना कायमचे अपंगत्व सुध्दा पत्करावा लागू शकतो हेही तेवढेच खरे आहे.शासन कोणतेही बांधकामाचे टेंडर काढतेवेळी नियम निकस लाऊनच कामाची जबाबदारी एखाद्या ठेकेदाराला देत असतो. काम सुरू असतांना त्या कामापासून कोणत्याही सामान्य मानसाला त्याचा त्रास होणार नाही किंवा कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याच्या येणाºया संपूर्ण खचार्ची जबाबदारी सुध्दा कंपनी मालकाला करणे गरजेचे असते. मात्र साकोली-लाखांदुर महामार्गावर अस काहीही होतानी दिसत नाही. सामान्य नागरीकांना याची जाणीव नसल्या कारणाने कोणीही पोलीसात तक्रार करण्यासही पुढाकार घेत नाही. याच कमजोरीचा फायदा घेत कंपनी चालक मनमर्जी काम चालवून नागरीकांना त्रास देतात.सबंधीत कामाकडे जिंमेदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गावरील अपघात ग्रस्तांना आर्थीक मदत मिळवून देण्याची गरज भासत आहे. रस्ता निर्मीती करून करोडो रुपये कंपनी मालक कमवून जाईल मात्र या कामासाठी गरीब नागरीकांनी आपले हातपाय गमवून आर्थिक भुर्दड का सोसावा असा प्रश्न सध्या तालुक्यातील नागरीक विचारीत आहे. विकास कामाला कुणीही विरोध करीत नाहीत मात्र विकास करतांनी त्याचा त्रास सामान्य नागरीकांना होणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस