शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

तलावांना कोरड, मासेमारी व्यवसाय संकटात; लीजचा पैसाही मिळेना

By युवराज गोमास | Updated: March 28, 2024 15:12 IST

कडक उन्हाचा परिणाम : जिल्ह्यतील प्रकल्पांमध्ये ४५ टक्के जलसाठा

युवराज गोमासे, भंडारा : जिल्ह्यात मध्यंम प्रकल्प ४, लघु प्रकल्प ३१ व मामा तलाव २८, असे एकूण ६३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सध्या ४५ टक्के जलसाठा आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. लहान तलाव व बोड्यांना कोरड पडली आहे. मोठ्या तलावांतील जलसाठा कमालीने घटला आहे. यंदा मे व जून महिन्यात पाणी प्रश्न भेडसावणार आहे. जनावरांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. अपुऱ्या जलसाठ्यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात असून लीजचा पैसा परत मिळणार काय, असा प्रश्न ढिवरबांधवांकडून विचारला जात आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. यात तलाव, नदी-नाल्यांचा समावेश आहे. ढिवर, भोई, कहार बांधवांकडून शासनाची लीज घेवून पारंपारिक मासेमारी केली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील मासेमारी करणारा ढिवर समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. राज्य शासनाने या समाजाच्या पारंपारिक मासेमारी व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याने स्थिती गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.

जिल्ह्यातील गाव व शहरालगतच्या तलाव, बोड्या नामशेष होत आहेत. बोड्या व तलावात अतिक्रमण आणि गाव तसेच शहरातील केरकचरा टाकल्या जात असल्याने त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिणामी तलावांवर मासेमारी करणाऱ्या समाजबांधवांचा व्यवसाय संकटात सापडला आहे.मच्छीपालन संस्थांना हवे आर्थिक पॅकेज

कडक उन व अल्प जलसाठ्यामुळे तलाव, बोड्यांना कोरड पडून मासोळ्या मृत होत पावत आहेत. जिल्ह्याच्या सिंचन सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. यापूर्वीही कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात मासेमारी संस्थांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे मच्छीपालन व्यवसाय करणाऱ्या संस्थांना शासनाने आर्थिक मदतीसाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी मत्स्य बीज उपलब्ध करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.संस्थांवर वाढतोय कर्जाचा बोझा

अनेक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या संस्था आर्थिक आहेत. परंतु, अन्य व्यवसायाचे कौशल्य या संस्थांकडे नसल्याने कर्ज काढून मासेमारी व्यवसायाला टिकविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, आर्थिक संकटांचा ससेमिरा संपत नसल्याने संस्थांवर कर्जाचा बोझा वाढता आहे.तलावांचे खोलीकरण गरजेचे

जिल्ह्यातील तलावांना अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे. याशिवाय तलावांत मोठ्या प्रमाणात वर्षांनुवर्षांचा गाळ साठून असल्याने जलसाठा अत्यल्प होत आहे. गाळ उपस्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. तसेच उथळ तलावांचे खोलीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणी