शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोंडवाडा कुणासाठी, कशासाठी?

By admin | Updated: August 5, 2016 00:38 IST

१४ लाख लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात समस्यांचा अंबार आहे. अतिक्रमणाच्या कोंडीत सापडलेल्या ...

मोकाट जनावरे रस्त्यावर : रहदारीला अडथळा, नगरपालिकेचे दुर्लक्ष इंद्रपाल कटकवार भंडारा १४ लाख लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात समस्यांचा अंबार आहे. अतिक्रमणाच्या कोंडीत सापडलेल्या या शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावरचा वावर नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात, तासन् तास उभी राहतात. याचा फटका रहदारीला बसत आहे. बसस्थानक परिसरासमोर असलेला कोंडवाडा कुणासाठी असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. भंडारा शहराची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या यासर्व बाबी नागरी सुविधांसाठी महत्वपूर्ण आहेत. शहरातील मुख्य समस्या असल्या तरी मोकाट जनावरांचे रस्त्यावर बस्तान असणे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. शहरातील लालबहादूर शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक ते लायब्ररी चौक, नागपूर नाका राष्ट्रीय महामार्ग ते कारधा लहान पूल, शास्त्रीनगर चौक ते खांबतलाव चौक ते रजनीनगर परिसर रस्त्यावर मोकाट जनावरांचे बस्तान दिसून येते. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. काही वर्षांपुर्वी बसस्थानक समोरील पश्चिम दिशेला कोंडवाडा होते. सद्यस्थितीत हा कोंडवाडा बसस्थानकासमोर असलेल्या दूरसंचार कार्यालयाच्या बाजुला आहे. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत असलेल्या या कोंडवाड्याची दूरवस्था झालेली आहे. यात असलेली इमारतीचीही जीर्ण अवस्था झाली आहे. पालिकेने दवंडी देऊनही जनावरे मोकाटच रस्त्यावर जनावरे बस्तान मांडून असल्याने रहदारीचा फटका सर्वांनाच बसतो. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाने पाच दिवसांपुर्वी भंडारा शहरात आॅटोतून दवंडी पिटली. यात शहरातील पशुपालकांनी मालकीची जनावरे रस्त्यावर सोडू नये, ती ताब्यात घेण्यात यावी अन्यथा नगरपालिका प्रशासन कारवाई करेल, अशी सूचना देण्यात आली होती. याला पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी जनावरे काही रस्त्यावरून हटलेली नाहीत. परिणामी ती जनावरे पशुपालकांची नाहीत, असे जाणवते. पालिका प्रशासन ही समस्या आतातरी ही समस्या गांभीर्याने सोडविणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर कांजीहौस कुणासाठी! सद्यस्थितीत कांजीहौसच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका प्रशासनाने कुलूप ठोकले आहे. मुख्य रस्त्यावर जनावरे फिरत असताना कांजीहौस कशासाठी उभारण्यात आला, असा प्रश्न भंडारेकरांना पडला आहे. रहदारीला अडथळा निर्माण होत असताना पालिका प्रशासन या मोकाट जनावरांचा कांजीहौसमध्ये बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न आहे.