शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गणेशपूरचा राजा यंदा दीड दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देसामाजिक भान : उत्सवावर होणारा सर्व खर्च देणार पूरग्रस्तांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण म्हणजे गणेशपुरचा राजा. आनंदाची पर्वणी. दहा दिवस उत्साहाचे. विविध उपक्रमांचे आयोजन. मात्र यंदा सामाजिक भान जपत सन्मित्र गणेश मंडळाचे उत्सवाचा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला. त्यामुळे भंडारेकरांचा लाडका गणेशपूरचा राजा केवळ दीड दिवसांचा राहणार आहे.गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते.वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात राबविले जातात. शासनाने एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून संमित्र गणेश मंडळाचा गौरवही केला आहे. अशा या मंडळाने यंदा सामाजिक भान जोपासत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात हजोरो कुटुंब उध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी सामाजिक भान ठेवत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होतो. हा खर्च टाळून संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा मंडळाने विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे पुराच्या आघातात उध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत होणार आहे. पूरपिडितांचे अश्रू याद्वारे पुसले जाणार आहे.गणेशोत्सवात भव्य सजावट, देखावा, रोशनाई आणि आरास यांना भाटा दिला जाईल. बाप्पांची स्थापनाही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येईल. या उत्सवातून वाचणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाईल.एकीकडे हजारो बांधवांच्या डोळ्यात आश्वांचा महापूर आला असताना गणेशोत्सवावर पैशाचा अपव्यय करणे उचित ठरणार नाही. त्यासाठी या मंडळाने सामाजिक भान जोपासत पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. मंडळाला दरवर्षी सढळहस्ते मदत करणाऱ्या नागरिकांनी यावर्षीही पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी. देणगीतून गोळा झालेला संपूर्ण निधी पूरग्रस्तांना पाठविला जाणार आहे.मिरवणुकीतून मदत संकलनगणेशोत्सवात सजावट, देखावे, रोशनाई आणि आरास न करता २ सप्टेंबर रोजी गणेशपूरच्या राजाची स्थापना केली जाईल. त्यादिवशी आरती, भजन, पूजन करून ३ सप्टेंबर रोजी बाप्पाची मिरणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत डिजे आणि बँडला फाटा देण्यात आला आहे. डफडी आणि शहनाई या परंपरागत वाद्याचा सहभाग राहील. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून जाईल. त्यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत केला जाणार आहे. या कार्याला भंडारेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाने केले आहे.मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून राबविले आहे. यंदा कोल्हापूर, सांगली महापूर आला. त्या पूरग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.-विनोद भुरे, अध्यक्ष सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर भंडारा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019