शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

गणेशपूरचा राजा यंदा दीड दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देसामाजिक भान : उत्सवावर होणारा सर्व खर्च देणार पूरग्रस्तांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण म्हणजे गणेशपुरचा राजा. आनंदाची पर्वणी. दहा दिवस उत्साहाचे. विविध उपक्रमांचे आयोजन. मात्र यंदा सामाजिक भान जपत सन्मित्र गणेश मंडळाचे उत्सवाचा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला. त्यामुळे भंडारेकरांचा लाडका गणेशपूरचा राजा केवळ दीड दिवसांचा राहणार आहे.गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते.वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात राबविले जातात. शासनाने एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून संमित्र गणेश मंडळाचा गौरवही केला आहे. अशा या मंडळाने यंदा सामाजिक भान जोपासत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात हजोरो कुटुंब उध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी सामाजिक भान ठेवत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होतो. हा खर्च टाळून संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा मंडळाने विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे पुराच्या आघातात उध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत होणार आहे. पूरपिडितांचे अश्रू याद्वारे पुसले जाणार आहे.गणेशोत्सवात भव्य सजावट, देखावा, रोशनाई आणि आरास यांना भाटा दिला जाईल. बाप्पांची स्थापनाही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येईल. या उत्सवातून वाचणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाईल.एकीकडे हजारो बांधवांच्या डोळ्यात आश्वांचा महापूर आला असताना गणेशोत्सवावर पैशाचा अपव्यय करणे उचित ठरणार नाही. त्यासाठी या मंडळाने सामाजिक भान जोपासत पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. मंडळाला दरवर्षी सढळहस्ते मदत करणाऱ्या नागरिकांनी यावर्षीही पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी. देणगीतून गोळा झालेला संपूर्ण निधी पूरग्रस्तांना पाठविला जाणार आहे.मिरवणुकीतून मदत संकलनगणेशोत्सवात सजावट, देखावे, रोशनाई आणि आरास न करता २ सप्टेंबर रोजी गणेशपूरच्या राजाची स्थापना केली जाईल. त्यादिवशी आरती, भजन, पूजन करून ३ सप्टेंबर रोजी बाप्पाची मिरणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत डिजे आणि बँडला फाटा देण्यात आला आहे. डफडी आणि शहनाई या परंपरागत वाद्याचा सहभाग राहील. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून जाईल. त्यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत केला जाणार आहे. या कार्याला भंडारेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाने केले आहे.मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून राबविले आहे. यंदा कोल्हापूर, सांगली महापूर आला. त्या पूरग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.-विनोद भुरे, अध्यक्ष सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर भंडारा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019