शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपूरचा राजा यंदा दीड दिवसांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:58 IST

गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देसामाजिक भान : उत्सवावर होणारा सर्व खर्च देणार पूरग्रस्तांना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण म्हणजे गणेशपुरचा राजा. आनंदाची पर्वणी. दहा दिवस उत्साहाचे. विविध उपक्रमांचे आयोजन. मात्र यंदा सामाजिक भान जपत सन्मित्र गणेश मंडळाचे उत्सवाचा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला. त्यामुळे भंडारेकरांचा लाडका गणेशपूरचा राजा केवळ दीड दिवसांचा राहणार आहे.गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते.वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात राबविले जातात. शासनाने एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून संमित्र गणेश मंडळाचा गौरवही केला आहे. अशा या मंडळाने यंदा सामाजिक भान जोपासत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात हजोरो कुटुंब उध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी सामाजिक भान ठेवत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होतो. हा खर्च टाळून संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा मंडळाने विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे पुराच्या आघातात उध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत होणार आहे. पूरपिडितांचे अश्रू याद्वारे पुसले जाणार आहे.गणेशोत्सवात भव्य सजावट, देखावा, रोशनाई आणि आरास यांना भाटा दिला जाईल. बाप्पांची स्थापनाही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येईल. या उत्सवातून वाचणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाईल.एकीकडे हजारो बांधवांच्या डोळ्यात आश्वांचा महापूर आला असताना गणेशोत्सवावर पैशाचा अपव्यय करणे उचित ठरणार नाही. त्यासाठी या मंडळाने सामाजिक भान जोपासत पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. मंडळाला दरवर्षी सढळहस्ते मदत करणाऱ्या नागरिकांनी यावर्षीही पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी. देणगीतून गोळा झालेला संपूर्ण निधी पूरग्रस्तांना पाठविला जाणार आहे.मिरवणुकीतून मदत संकलनगणेशोत्सवात सजावट, देखावे, रोशनाई आणि आरास न करता २ सप्टेंबर रोजी गणेशपूरच्या राजाची स्थापना केली जाईल. त्यादिवशी आरती, भजन, पूजन करून ३ सप्टेंबर रोजी बाप्पाची मिरणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत डिजे आणि बँडला फाटा देण्यात आला आहे. डफडी आणि शहनाई या परंपरागत वाद्याचा सहभाग राहील. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून जाईल. त्यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत केला जाणार आहे. या कार्याला भंडारेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाने केले आहे.मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून राबविले आहे. यंदा कोल्हापूर, सांगली महापूर आला. त्या पूरग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.-विनोद भुरे, अध्यक्ष सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर भंडारा.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019