शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख ९२ हजार हेक्टर खरीप नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:29 IST

आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्दे४५ हजार क्विंटल बियाणे : ८६ हजार क्विंटल खताचे आवंटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे.यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होईल. जिल्ह्यात २ लाख ३ हजार ६३९ हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. तर ४६ हजार ६१० हेक्टर रबी क्षेत्र आहे. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात ७४.६१ मिमी सरासरी नोंद झाली. आता खरीप हंगाम २०१९-२० साठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. १ लाख ९२ हजार ६५० हेक्टरचे नियोजन करण्यात आले. यात खरीप धान १ लाख ८० हजार हेक्टर, तुर १२ हजार १०० हेक्टर, सोयाबीन ५०० हेक्टर आहे.भातपिकासाठी ४३ हजार ७३९ क्विंटल बियाणे, तुरीचे ८६५ क्विंटल आणि सोयाबीनच्या ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया ३८ हजार ७४० क्विंटल, डीएपी १० हजार ६३० क्विंटल, एसएसपी ११ हजार ३१० क्विंटल, एमओपी २ हजार ९८० क्विंटल व संयुक्त खते २३ हजार ४४० क्विंटल असे ८६ हजार १०० क्विंटलचे आवंटन आहे.४१४ कोटींचे पीक कर्ज२०१९ च्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. ९८ हजार २६० सभासदांना ४१४ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे नियोजन आहे. २०१८-१९ मध्ये ६९ हजार ४२४ सभासदांना ३३४ कोटी ७६ लाखांचे पीक कर्ज वितरीत केले होते. यात राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व जिल्हा सहकारी बँकेचा समावेश आहे. खरीप हंगाम २०१८ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ६७ धान केंद्रांवर खरेदी करण्यात आली. ४७ हजार ४७३ शेतकऱ्यांकडून १५ लाख २० हजार ६१० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यासाठी २६६ कोटी १० लाख रुपयांचे चुकारे देण्यात आले.खरीप हंगामपूर्व आढावा बैठकखरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. यावेळी पावसाचा चांगला अंदाज असल्याने कृषी विभागाने योग्य नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रत्नाकर खांडेकर, कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीक कर्ज वाटप पीएम किसान योजना, जलयुक्त शिवार आदींचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती