शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खरबीचा अल्पभूधारक शेतकरी बनला उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : पनीरची विक्रमी विक्री, कोरोना संकाटकाळात अन्य व्यवसायिकांना दिली प्रेरणा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू होताच दुध संकलन बंद झाले. मात्र अशा संकटातून आशेचा किरण शोधत भंडारा तालुक्यातील खरबीनाका येथील शेतकरी धनराज आकरे याने कुटुंबियाच्या मदतीने पनीर तयार करुन सोशल मीडियाच्या आधाराने पनीरची विक्रमी विक्री केली.धनराज आकरे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. वडिलोपार्जित शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी आपल्या घरी चार गायी पाळल्या. त्यामुळे दुग्ध व्यवसायाची जोड मिळाल्याने शेतीला भक्कम आधार झाला. दुसरीकडे शेतीचे उत्पादन दुप्पटीने वाढले. सर्व सुरळीत चालू असतानाच अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आकरे यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला. लॉकडाऊनपुर्वी आकरे आपल्या गावातील दुध डेअरीत दुध घालायचे. मात्र कोरोना प्रादूर्भाव वाढताच दुध खरेदी बंद झाली. दररोज निघणारे २५ लिटर दुधाचे काय करायचे असा प्रश्न त्यांना सतावू लागला. सुरुवातीला चार दिवस गावातच नातेवाईक तसेच मित्र मंडळीना नि:शुल्क दुधाचे वितरण केले. कोरोनाच्या धास्तीने दुधाचे घरोघरी वाटप बंद झाले. पत्नी शामकला यांच्या कल्पनेतून जर आपण पनीर करुन विक्री केली तर यातूनच त्यांनी मुलगा रोहित, मुलगी हिमांशी, आई-वडील यांच्या मदतीने पनीर बनवायला सुरुवात केली. पहिले तीन दिवस पनीर घेण्यासाठी कुणी तयार होत नव्हते. मात्र काही मित्रांनी कोरोनाबाबत घेतलेल्या दक्षतेची हमी दिल्यावर पनीर खरेदी केले. त्यानंतर शेतकरी सेवार्थ दुध तसेच गावातील इतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माहिती टाकताच हळूहळू आॅर्डर येवू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. यातूनच निघणाऱ्या २५ लिटर दुधाचे पनीर तयार करुन परिसरातील गावात विक्री करण्याचे ठरविले. अल्पवधीतच पनीरसाठी आॅर्डर येवू लागले. यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पनीर खरेदीविषयी आवाहन केले. शिथिलतेमुळे ग्राहक विक्री योजनेतून भाजीपाला विकण्यासही सुरुवात केली. पनीर विक्रीतून दीड महिन्याचे ५० हजाराचे नुकसान तर टळेलच याशिवाय अपेक्षीत नफाही मिळाला.अचानक दुध विक्री बंद झाल्याने पनीर निर्मितीचा निर्णय घेतला. अल्पावधित याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.-धनराज आकरे, दुध उत्पादक शेतकरी, खरबीलॉकडाऊनमुळे सगळेच जग बदलून गेले आहेत. शेतकºयांनी गटाच्या माध्यमातून व्यवसाय करीत थेट विक्री केल्यास भविष्यात खूप चांगले दिवस येतील.-रेणुका दराडे, कृषी सहायक परसोडी

टॅग्स :Farmerशेतकरीbusinessव्यवसाय