शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

खडकी पाणीपुरवठा योजना दुर्लक्षित

By admin | Updated: March 13, 2015 00:42 IST

मोहाडी तालुक्यात खडकी गावासाठी सन २००९-१० मध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्याला पाच वर्षाचा कालावधी लोटत असताना अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत.

युवराज गोमासे करडीमोहाडी तालुक्यात खडकी गावासाठी सन २००९-१० मध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्याला पाच वर्षाचा कालावधी लोटत असताना अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. परिणामी ग्रामवासीयात अधिकाऱ्यांप्रती तीव्र असंतोषाची भावना आहे. योजना बंद अवस्थेत आहे. योजना ग्रामपंचायतीला हस्तांतरीत झालेली नाही.सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या खडकी गावासाठी पाच वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात केली गेली. या अंतर्गत गावाबाहेर टोलीवर ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली गेली. सुमारे ५ कि.मी. अंतरावरील वैनगंगा नदीकाठावर पंप हाऊस व पात्रात विहीर खोदली गेली. योजनेसाठी ४५ लाखाची अंदाजपत्रकीय तरतूद केली गेली. मात्र सन २००९-१० पासून अजूनही योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत. ग्रामवासी पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. कामांसाठी पैशाची कमतरता नसताना योजनेची कामे का पूर्ण केली गेली नाहीत. ग्रामवासीयांना पाणी का दिले जात नाही असा प्रश्न नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जात आहे. मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांच्या असंतोषात भर पडत आहे. दोन वर्षापूर्वी योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती. मात्र वारंवार पाच कि.मी. अंतरावरील पाईप लाईन मध्ये दोष निर्माण होत होता. पाईपलाईनला तडे जात असल्याने सुद्धा अडचणी वाढल्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना केल्या नाही. त्याचा परिणाम ग्रामवासीयांना आज भोगावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. कंत्राटदाराला त्याचवेळी सूचना देऊन कामे पूर्ण करायला पाहिजे होते. असेही मत व्यक्तय होत आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत असताना ग्रामप्रशासन चुप्पी साधून आहे. पाणी पुरवठा योजनेसंबंधाने एका लोकप्रतिनिधीने ग्रामसभेत प्रश्न लावून धरला होता. परंतु राजकीय वास त्या मुद्यातून दिसून आल्याने नागरिकांनी त्यास गांभीर्याने पाठींबा दिला नव्हता.आज जवळपास अंदायपत्रकीय रकमेच्या ३९ लाखापर्यंतचा खर्च योजनेवर झालेला असताना योजना बंद असून नागरिकांसाठी वांझोटी ठरली आहे.