शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

जनतेप्रती जाणीव ठेवावी

By admin | Updated: March 10, 2016 00:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्ष साजरे करतांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती अधिक संवेदनशील, सामाजिक...

राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा : ई. झेड. खोब्रागडे यांचे प्रतिपादनभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्ष साजरे करतांना शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती अधिक संवेदनशील, सामाजिक आणि उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून प्रशासनात काम केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळा सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संतोष बनसोडे, प्रा. वामन गवई, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते. खोब्रागडे म्हणाले, शासन, प्रशासनात काम करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो. म्हणून त्यांनी अधिक पारदर्शी, संविधाननिष्ठ आणि वैयक्तिक नितीमत्तेचे भान ठेवून आपले काम करावे. अधिकाऱ्यांच्या जाणिवा सामाजिक असल्या तर कामात लक्षणिय फरक पडतो, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच समाज घटकांसाठी खुप काम केले. महिलांना मालमत्तेमध्ये समान अधिकार देण्याचे काम असो की, कामगार कायदे करण्याचे काम असो. त्यांनी संविधानात मुलभुत तत्वे व मुलभुत अधिकार यांच्या माध्यमातुन समाजाला एका स्तरावर आणले. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची सर्वांना माहिती व्हावी आणि अधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी जे समानतेचे स्वप्न पाहिले होते ते प्रत्यक्षात आणण्याची जाणीव आपल्यातही निर्माण व्हावी, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे, असे ते म्हणाले. प्रा. संतोष बनसोडे यांनी बाबासाहेबांचे स्त्रीवादी कार्य यावर प्रकाशझोत टाकला. भारतातील स्त्री ही धार्मिक ग्रंथांची गुलाम होती. त्यामुळे प्रथम तिला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी माहिलांच्या परिषदा घेतल्या. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी पहिल्यांदा सायमन कमिशनसमोर हा विषय मांडला. महिलांना ३६ आठवड्याची प्रसूती रजा याबरोबरच कुटुंबनियोजन आणि स्त्रियांसाठी रुग्णालये, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, यासाठी विधेयके मांडलीत. हिंदु कोड बील मांडले. मात्र हे बील तेव्हाच्या सरकारने मंजूर केले नाही तेव्हा बाबासाहेबांनी राजिनामा दिला, असे बनसोडे यांनी सांगितले. प्रा. वामन गवई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. नरेश आंबिलकर यांनी जादुटोणा विरोधी कायद्यावर आणि श्रीकांत परिंदे यांनी मागदर्शन केले. बाबासाहेबांचे विचार यावर वकृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डी. एन. धारगावे यांनी केले. या कार्यशाळेला सर्व विभागातील राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)