शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

विकास साधताना पर्यावरणाचा समतोल ठेवा

By admin | Updated: March 8, 2015 00:27 IST

तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे ...

पवनी : तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे भविष्यात मानव पृथ्वीतलावरुन विलुप्त होईल, असा संशय डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. पवनी येथे आयोजित राज्यस्तरीय मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मानवाने निसर्गावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यावा व पर्यावरणाचा मातेसमान सन्मान करावा असे आवाहन ही केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत विज्ञान महाविद्यालय पवनी येथे मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर बुधवारला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. अरुणकुमार शेळके, डॉ. सतिश वटे, डॉ. के.सी. देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होतीे.तीन सत्रामध्ये आयोजित चर्चासत्राच्या पहिला सत्रामध्ये निरी नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल यांनी मानवी कृतीचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम आणि श्वावत विकास या विषयावर परिणामकारक पद्घतीने आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात नोयडा (उ.प्र.) येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.आर. चौधरी यांनी वायुप्रदूषणाची सद्यस्थिती आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या विषयावर साध्या व सोप्या भाषेत परिणामकारक आपले विचार मांडले. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात जागतिक बँकेचे सल्लागार आणि पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी मानवी उत्सर्जनाचा कृषी वर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान दिले.समारोपीय कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे आणि प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. या चर्चासत्राला राज्यातील विविध विद्यापीठातील सुमारे २०० संशोधक प्राध्यापक आणि महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मागील दोन महिन्यापासुन प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे, डॉ.जी.ए.अवचार यांचा मार्गदर्शनाखाली प्रा. विजय लेपसे संयोजक, प्रा. ए.के. अणे, सहसंयोजक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होते. (तालुका प्रतिनिधी)