शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

विकास साधताना पर्यावरणाचा समतोल ठेवा

By admin | Updated: March 8, 2015 00:27 IST

तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे ...

पवनी : तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी व विकास साधताना पर्यावरणाच्या समतोल बिघडणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, विज्ञानाच्या एकांगी विकासांमुळे भविष्यात मानव पृथ्वीतलावरुन विलुप्त होईल, असा संशय डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. पवनी येथे आयोजित राज्यस्तरीय मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावरील चर्चासत्रादरम्यान त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मानवाने निसर्गावर मात करायचा प्रयत्न सोडून द्यावा व पर्यावरणाचा मातेसमान सन्मान करावा असे आवाहन ही केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालीत विज्ञान महाविद्यालय पवनी येथे मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर बुधवारला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. अरुणकुमार शेळके, डॉ. सतिश वटे, डॉ. के.सी. देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होतीे.तीन सत्रामध्ये आयोजित चर्चासत्राच्या पहिला सत्रामध्ये निरी नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गोयल यांनी मानवी कृतीचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम आणि श्वावत विकास या विषयावर परिणामकारक पद्घतीने आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात नोयडा (उ.प्र.) येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.आर. चौधरी यांनी वायुप्रदूषणाची सद्यस्थिती आणि त्याचा मानवाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या विषयावर साध्या व सोप्या भाषेत परिणामकारक आपले विचार मांडले. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात जागतिक बँकेचे सल्लागार आणि पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. रमेश ठाकरे यांनी मानवी उत्सर्जनाचा कृषी वर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान दिले.समारोपीय कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे आणि प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे यांच्या उपस्थितीत पार पडला. या चर्चासत्राला राज्यातील विविध विद्यापीठातील सुमारे २०० संशोधक प्राध्यापक आणि महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी मागील दोन महिन्यापासुन प्राचार्य डॉ. डी.के. बुरघाटे, डॉ.जी.ए.अवचार यांचा मार्गदर्शनाखाली प्रा. विजय लेपसे संयोजक, प्रा. ए.के. अणे, सहसंयोजक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होते. (तालुका प्रतिनिधी)