शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

शाळा व्यवस्थापन समितीच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: October 4, 2014 23:21 IST

शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली.

चिचाळ : शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली. मात्र गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा उपयोग काय असा प्रश्न समिती करीत आहे.शासनाने मुख्याध्यापकावरील कामाचा कार्यभार लक्षात घेऊन त्यांचे कडील सोपविलेल्या शालेय पोषण आहाराची जिम्मेदारी कमी करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी करून राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळेला देण्यात आले. त्यानुसार पवनी तालुक्यातील प्राथमिक शाळा खैरी येथे शाळा व्यवस्थापन समितीने गावात दवंडीद्वारे सूचना देऊन २ जुलैला सभा घेतली. या सभेत शारदा माता बचत गट खैरी, लक्ष्मी महिला बचत गट पंचशील महिला बचत गट व अहिल्याबाई महिला बचत गट उपस्थित झाले. त्यामुळे ईश्वरचिट्टीने महिलांची निवड करण्यात आली. त्यात शारदा माता महिला बचत गटाची निवड करण्यात आली. त्या नुसार सदर गटांच्या महिला शाळेत आहाराचे काम देण्यात आले. मात्र त्यानंतर जुन्याच महिलांकडो मध्यान्ह भोजनाची जबाबदारी देण्याचे पत्र शाळेला पाठविण्यात आले. त्यानुसार जुन्या स्वयंपाकी व मदतनिस यांचे काम समाधान कारक नसल्याने त्यांना परत नियुक्ती देण्यात येवू नये असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र त्या पत्रात स्वयंपाकी यांचे काम समाधानकारक नसेल तर मात्र विहित प्रक्रियेचा अवलंब करून त्या ठिकाणी नवीन नियुक्ती देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला कार्यवाही करता येईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही व शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव देवूनही गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाला जुमनात नसल्याने सदर शाळेच्या मुख्याध्यापकाला मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.सदर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास व पुन्हा जुन्या आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती केल्यास शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांच्या टी.सी. काढण्याचा इशारा पालकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामलाल खऊळ, निर्मला नान्हे, हर्षा तुपटे, सुनिता पारधी, माधुरी पारधी, छाया पडोळे, शिला ढेंगर, अशोक मांढरे, कैलाश मेश्राम, शेषराव कुथे, शालीनी आठवले व पालकांनी केली आहे.(वार्ताहर)