शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समितीच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: October 4, 2014 23:21 IST

शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली.

चिचाळ : शासनाने मुख्याध्यापकावरील शालेय पोषण आहाराची जबाबदारी कमी करून ती महिला बचत गटांना देण्यात यावे या आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समितीने सभा घेवून गटाची नियुक्ती केली. मात्र गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीचा उपयोग काय असा प्रश्न समिती करीत आहे.शासनाने मुख्याध्यापकावरील कामाचा कार्यभार लक्षात घेऊन त्यांचे कडील सोपविलेल्या शालेय पोषण आहाराची जिम्मेदारी कमी करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी करून राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळेला देण्यात आले. त्यानुसार पवनी तालुक्यातील प्राथमिक शाळा खैरी येथे शाळा व्यवस्थापन समितीने गावात दवंडीद्वारे सूचना देऊन २ जुलैला सभा घेतली. या सभेत शारदा माता बचत गट खैरी, लक्ष्मी महिला बचत गट पंचशील महिला बचत गट व अहिल्याबाई महिला बचत गट उपस्थित झाले. त्यामुळे ईश्वरचिट्टीने महिलांची निवड करण्यात आली. त्यात शारदा माता महिला बचत गटाची निवड करण्यात आली. त्या नुसार सदर गटांच्या महिला शाळेत आहाराचे काम देण्यात आले. मात्र त्यानंतर जुन्याच महिलांकडो मध्यान्ह भोजनाची जबाबदारी देण्याचे पत्र शाळेला पाठविण्यात आले. त्यानुसार जुन्या स्वयंपाकी व मदतनिस यांचे काम समाधान कारक नसल्याने त्यांना परत नियुक्ती देण्यात येवू नये असे सर्वानुमते ठराव घेण्यात आला. मात्र त्या पत्रात स्वयंपाकी यांचे काम समाधानकारक नसेल तर मात्र विहित प्रक्रियेचा अवलंब करून त्या ठिकाणी नवीन नियुक्ती देण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला कार्यवाही करता येईल असा स्पष्ट उल्लेख असतानाही व शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव देवूनही गटशिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाला जुमनात नसल्याने सदर शाळेच्या मुख्याध्यापकाला मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.सदर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास व पुन्हा जुन्या आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती केल्यास शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांच्या टी.सी. काढण्याचा इशारा पालकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामलाल खऊळ, निर्मला नान्हे, हर्षा तुपटे, सुनिता पारधी, माधुरी पारधी, छाया पडोळे, शिला ढेंगर, अशोक मांढरे, कैलाश मेश्राम, शेषराव कुथे, शालीनी आठवले व पालकांनी केली आहे.(वार्ताहर)