लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु महागाई नियंत्रित आणण्याकरिता कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. याचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जुमला (भोंगा) आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढून निवेदन देण्यात आले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. विविध घोषणा देत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते येथील त्रिमुर्ती चौकात धडकले. त्याठिकाणी धरणे देण्यात आले. यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात विरोधी पक्षात समाजकार्य करणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बेकायदेशीररीत्या अटक करून आसामला नेऊन कोंडले. त्यांना नाहक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. आंदोलनात प्रेमसागर गणवीर, सुरेश मेश्राम, राजेश हटवार, प्रशांत देशकर, रमेश पारधी, सुभाष आजवले, शफी लद्दानी, राजू पालीवाल, प्रेमदास वनवे, पवन मस्के, पवन वंजारी, आकाश कोरे, बालू ठवकर, राजू निर्वाण, मार्कंड बडोले, मनीषा हलमारे, योगिता झलके, सरिता कापसे, विद्या कुंभरे, योगेश गायधने, देवेंद्र हजारे, अजय चवडे, संदीप बावनकुळे, डाॅ. मनीषा निंबार्ते, शालू तिरपुडे, अनिता भुरे, सुनील बांते, नरेंद्र रामटेके, भाऊ कातोरे, धर्मराज रामपुर, आकाश बोंद्रे, प्रमोद कटरे, एकनाथ भुरे यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.