शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्च्यात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:04 IST

भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम यांचे आवाहन : साकोलीत परिवर्तन यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. देशात लोकशाही आणायची असेल व बहुजनांना न्याय पाहिजे असेल तर सर्व जाती समुहांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्च्याच्या सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.होमगार्ड परेड ग्राऊंड येथे आयोजित परिवर्तन यात्राप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होतेकार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संघटक ओबीसी महासंघाचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे धर्मराज भलावी, भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, राष्टÑीय मुस्लीम मोर्चा तालुकाध्यक्ष फिरोज खान, व्ही. जे. एन.टी. अधिकार बचाव संघर्ष समितीचे, कार्तिक वडसकर, बुध्दिस्ट फेडरेशनचे केदार नाकाडे आदी उपस्थित होते.राष्टÑीय संयोजक वामन मेश्राम म्हणाले की, देशातील सहा हजार जातींना जागे करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेस नागनाथ तर बी.जे.पी. सापनाथ आहे. नागनाथने दंश केला तर माणुस ताबडतोब मरतो तर, सापानाथने दंश केला तर माणुस एक तासात मरतो, हे दोन्ही पक्ष हीच भूमिका बजावितात. हे दोन्ही पक्ष बहुजनांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व जातींना जोडण्याचा काम सुरु आहे. २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या विरोधात आलेला निर्णय हा संविधानच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाणारा आहे. सर्व बहुजनांवर अन्याय सुरुच आहे. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे बहुजन विरोधी नितीच्या विरोधात बहुजन क्रांतीमोर्चा यात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात ही रॅली जाणार असून या रॅलीची सुरुवात २४ एप्रिलला दिक्षाभूमी नागपूर येथून झाली. त्याचा समारोप ३ जुनला पूणे येथे समारोपीय अभिवादन महारॅली घेणार आहे.संचालन व प्रास्ताविक स्वप्नील वासनिक यांनी केले. त्आभार विवेकानंद राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वप्नील गजभिये, शुभम कुकडे, हरि येरणे, रुपेश खानोरकर व सर्व बहुजन क्रांती मोर्च्याची संयोजन समिती यांनी केले. भर उन्हात दुपारी २ वाजतापर्यंत सभा चालली. सभेला शेकडोंची गर्दी झाली होती. भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली