शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संघटित होऊन बहुजन क्रांती मोर्च्यात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:04 IST

भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम यांचे आवाहन : साकोलीत परिवर्तन यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भारतामध्ये इंग्रजाची 'पॉलिसी' होती. बाटो और राज करो, त्यामुळे मुलनिवासी यांना सहा हजार जातीत विभाजन करुन सत्ता भोगली. त्यानंतर ज्या राजकीय पक्षांनी हातात सत्ता घेतली त्यांनी विविध जातीत फुट पाडून आणि राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. देशात लोकशाही आणायची असेल व बहुजनांना न्याय पाहिजे असेल तर सर्व जाती समुहांनी एकत्र येऊन बहुजन क्रांती मोर्च्याच्या सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन क्रांती मोर्च्याचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले.होमगार्ड परेड ग्राऊंड येथे आयोजित परिवर्तन यात्राप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होतेकार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संघटक ओबीसी महासंघाचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशनचे धर्मराज भलावी, भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, राष्टÑीय मुस्लीम मोर्चा तालुकाध्यक्ष फिरोज खान, व्ही. जे. एन.टी. अधिकार बचाव संघर्ष समितीचे, कार्तिक वडसकर, बुध्दिस्ट फेडरेशनचे केदार नाकाडे आदी उपस्थित होते.राष्टÑीय संयोजक वामन मेश्राम म्हणाले की, देशातील सहा हजार जातींना जागे करण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेस नागनाथ तर बी.जे.पी. सापनाथ आहे. नागनाथने दंश केला तर माणुस ताबडतोब मरतो तर, सापानाथने दंश केला तर माणुस एक तासात मरतो, हे दोन्ही पक्ष हीच भूमिका बजावितात. हे दोन्ही पक्ष बहुजनांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व जातींना जोडण्याचा काम सुरु आहे. २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या विरोधात आलेला निर्णय हा संविधानच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात जाणारा आहे. सर्व बहुजनांवर अन्याय सुरुच आहे. त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे बहुजन विरोधी नितीच्या विरोधात बहुजन क्रांतीमोर्चा यात्रेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात ही रॅली जाणार असून या रॅलीची सुरुवात २४ एप्रिलला दिक्षाभूमी नागपूर येथून झाली. त्याचा समारोप ३ जुनला पूणे येथे समारोपीय अभिवादन महारॅली घेणार आहे.संचालन व प्रास्ताविक स्वप्नील वासनिक यांनी केले. त्आभार विवेकानंद राऊत यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वप्नील गजभिये, शुभम कुकडे, हरि येरणे, रुपेश खानोरकर व सर्व बहुजन क्रांती मोर्च्याची संयोजन समिती यांनी केले. भर उन्हात दुपारी २ वाजतापर्यंत सभा चालली. सभेला शेकडोंची गर्दी झाली होती. भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली