शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शेतकऱ्यांचे हित जोपासणे शासनाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : मिरची निर्यात करणाºया कंटेनरला दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा हा अत्यंत कष्टाळू आणि निसगार्चे वरदान लाभलेला जिल्हा आहे आणि येथून भाजीपाला एक्सपोर्ट करणारे पहिले कंटेनर दुबईला जात आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्यात उपक्रमाअंतर्गत समृद्धी मार्गाने दुबईला पाठविल्या जाणाºया १३ टन मिरचीच्या पहिल्या कंटेनरला रविवारी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री यांनी वडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राची पाहणी केली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, आशिष जयस्वाल, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गणेश जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेसच्या सीमा भुरे, शहराध्यक्ष सचिन घनमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, संचालक अरविंद कारेमोरे, गुलराज कुंदवाणी व पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, आमदार कारेमोरे आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पावले उचलीत आहे.यावेळी बाजार समिती आणि जिल्हा स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वडेगाव येथे पंधरा दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर कडून सुविधा केंद्र हस्तांतरित केल्यानंतर निर्यात उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती मित्राय फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन प्रफुल्ल बांडेबुचे यांनी दिली. या केंद्राद्वारे ४५ टन भेंडी यापूर्वी हवाईमार्गाने निर्यात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ३ फेब्रुवारी नंतर दोन कंटेनर पाठवण्याची योजना आहे. निर्यात उपक्रमामुळे सुविधा केंद्राने रोजगार निर्मिती केली आहे, असेही ते म्हणाले. संचालन प्रफुल बांडेबुचे यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी