शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांचे हित जोपासणे शासनाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री : मिरची निर्यात करणाºया कंटेनरला दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा हा अत्यंत कष्टाळू आणि निसगार्चे वरदान लाभलेला जिल्हा आहे आणि येथून भाजीपाला एक्सपोर्ट करणारे पहिले कंटेनर दुबईला जात आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. नागपूर येथील मित्राय फॉर्मर्स प्रोड्यूूसर कंपनी आणि पुणे येथील युनिटी असोसिएट्स यांनी विविध कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या निर्यात उपक्रमाअंतर्गत समृद्धी मार्गाने दुबईला पाठविल्या जाणाºया १३ टन मिरचीच्या पहिल्या कंटेनरला रविवारी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री यांनी वडेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्राची पाहणी केली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, आशिष जयस्वाल, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गणेश जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेसच्या सीमा भुरे, शहराध्यक्ष सचिन घनमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, संचालक अरविंद कारेमोरे, गुलराज कुंदवाणी व पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री म्हणाले, आमदार कारेमोरे आणि कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडले. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पावले उचलीत आहे.यावेळी बाजार समिती आणि जिल्हा स्वस्त दुकानदार संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वडेगाव येथे पंधरा दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर कडून सुविधा केंद्र हस्तांतरित केल्यानंतर निर्यात उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती मित्राय फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन प्रफुल्ल बांडेबुचे यांनी दिली. या केंद्राद्वारे ४५ टन भेंडी यापूर्वी हवाईमार्गाने निर्यात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ३ फेब्रुवारी नंतर दोन कंटेनर पाठवण्याची योजना आहे. निर्यात उपक्रमामुळे सुविधा केंद्राने रोजगार निर्मिती केली आहे, असेही ते म्हणाले. संचालन प्रफुल बांडेबुचे यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी