शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

लाभार्थ्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

By admin | Updated: December 13, 2014 01:05 IST

कुठल्याही योजनेत लाभार्थी हा केंद्रबिंदू असतो. केंद्र अथवा राज्य पातळीहून येणाऱ्या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्क देता यावे, याकडे लक्ष असायला पाहिजे.

पवनी : कुठल्याही योजनेत लाभार्थी हा केंद्रबिंदू असतो. केंद्र अथवा राज्य पातळीहून येणाऱ्या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्क देता यावे, याकडे लक्ष असायला पाहिजे. लाभार्थ्यांचे हित जोपासणे हे महत्वाचे आहे. अशी विचारपूर्ण प्रतिपादन पवनीचे तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी केले.लोकमत प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत तहसीलदार राचेलवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, तहसीलदार हा तालुका दंडाधिकारीसुध्दा असतो. दालनामध्ये येणारा प्रत्येक विषय हा महत्वपूर्ण असतो. निर्णय देताना संबंधित अधिकाऱ्याची विवेक बृध्दी व विषयाचे गांभीर्य यात तारतम्य बाळगणे अतिशय महत्वाचे आहे. पवनी तालुक्यात १४२ गावे असून रिठी गावांची संख्या १५ आहे. जवळपास १४० च्या वर गावांमध्ये खरिप पिके घेण्यात येतात. रबी पिके घेणाऱ्या गावांची संख्या सात आहे. पवनी हे ऐतिहासिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. नगर पालिका प्रशासन, पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभाराशी सरळ संबंध पवनीशी येत असतो. नैसर्गिक आपत्ती किंवा साधारण समस्येत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला चाणाक्ष असणे महत्वाचे आहे. परिणामी निर्णय घेताना अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सोपे जाते. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची तीन पदे मंजूर असून त्या तिन्ही पदावर अधिकारी कार्यरत आहेत. मंडळ अधिकाऱ्यांची ७ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत. तलाठ्यांनी ३३ पदे मंजूर असून २९ तलाठी कर्तव्यावर आहेत. चार तलाठयांची जागा रिक्त आहेत. अव्वल कारकुनांची संख्या सात असून लिपिकांची मंजूर संख्या १६ इतकी आहे. काही रिक्तपदांमुळे संबंधित पदांचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असल्यामुळे कामाचा ताण वाढत असतो. पद भरतीसाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच कर्मचारी मिळण्याची आशा आहे.पवनी तहसील कार्यालयांतर्गत अन्न पुरवठा विभागांतर्गत बीपीएल लाभार्थ्यांची संख्या ११ हजार ९७९ इतकी आहे. अंत्योंदय चे लाभार्थी ८२०१ असून केशरी कार्ड लाभार्थ्यांची संख्या ८८५५ इतकी आहे. बीपीएलधारकांची संख्या प्रति युनिटनुसार अर्धा किलो साखर दिली जाते. मात्र ही मात्रा पुरवठ्यावर अवलंबून असते. तालुक्यांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार ६८५ तर श्रावण बाळ योजनेचे ९ हजार ७१५ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ४ हजार ८०७, इंदिरा गांधी विधवा योजनेचे ४३२ तर अपंग योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १७ इतकी आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसाठी सदनिकेची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)