शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांचे हित जोपासणे महत्त्वाचे

By admin | Updated: December 13, 2014 01:05 IST

कुठल्याही योजनेत लाभार्थी हा केंद्रबिंदू असतो. केंद्र अथवा राज्य पातळीहून येणाऱ्या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्क देता यावे, याकडे लक्ष असायला पाहिजे.

पवनी : कुठल्याही योजनेत लाभार्थी हा केंद्रबिंदू असतो. केंद्र अथवा राज्य पातळीहून येणाऱ्या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला त्याचे हक्क देता यावे, याकडे लक्ष असायला पाहिजे. लाभार्थ्यांचे हित जोपासणे हे महत्वाचे आहे. अशी विचारपूर्ण प्रतिपादन पवनीचे तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी केले.लोकमत प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखतीत तहसीलदार राचेलवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, तहसीलदार हा तालुका दंडाधिकारीसुध्दा असतो. दालनामध्ये येणारा प्रत्येक विषय हा महत्वपूर्ण असतो. निर्णय देताना संबंधित अधिकाऱ्याची विवेक बृध्दी व विषयाचे गांभीर्य यात तारतम्य बाळगणे अतिशय महत्वाचे आहे. पवनी तालुक्यात १४२ गावे असून रिठी गावांची संख्या १५ आहे. जवळपास १४० च्या वर गावांमध्ये खरिप पिके घेण्यात येतात. रबी पिके घेणाऱ्या गावांची संख्या सात आहे. पवनी हे ऐतिहासिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. नगर पालिका प्रशासन, पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभाराशी सरळ संबंध पवनीशी येत असतो. नैसर्गिक आपत्ती किंवा साधारण समस्येत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला चाणाक्ष असणे महत्वाचे आहे. परिणामी निर्णय घेताना अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सोपे जाते. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची तीन पदे मंजूर असून त्या तिन्ही पदावर अधिकारी कार्यरत आहेत. मंडळ अधिकाऱ्यांची ७ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत. तलाठ्यांनी ३३ पदे मंजूर असून २९ तलाठी कर्तव्यावर आहेत. चार तलाठयांची जागा रिक्त आहेत. अव्वल कारकुनांची संख्या सात असून लिपिकांची मंजूर संख्या १६ इतकी आहे. काही रिक्तपदांमुळे संबंधित पदांचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला असल्यामुळे कामाचा ताण वाढत असतो. पद भरतीसाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच कर्मचारी मिळण्याची आशा आहे.पवनी तहसील कार्यालयांतर्गत अन्न पुरवठा विभागांतर्गत बीपीएल लाभार्थ्यांची संख्या ११ हजार ९७९ इतकी आहे. अंत्योंदय चे लाभार्थी ८२०१ असून केशरी कार्ड लाभार्थ्यांची संख्या ८८५५ इतकी आहे. बीपीएलधारकांची संख्या प्रति युनिटनुसार अर्धा किलो साखर दिली जाते. मात्र ही मात्रा पुरवठ्यावर अवलंबून असते. तालुक्यांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार ६८५ तर श्रावण बाळ योजनेचे ९ हजार ७१५ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे ४ हजार ८०७, इंदिरा गांधी विधवा योजनेचे ४३२ तर अपंग योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या १७ इतकी आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांसाठी सदनिकेची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)