शहरं
Join us  
Trending Stories
1
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
5
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
6
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
7
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
8
मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
9
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
10
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
11
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
12
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
13
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
14
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
15
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
16
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
17
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट
18
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
19
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
20
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड

जिल्ह्यातील ६१७ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाई आराखडा : १२ कोटी ९० लाखांची कामे प्रस्तावित

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील एकुण ६१७ गावातील ११६३ स्त्रोतांना पाणीटंचाईची झळ सोसण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर १२ कोटी ९० लाख ८१ हजार रुपयांची प्रस्तावित उपाययोजना करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे. जूनदरम्यान अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे. याचा अनेक नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० चा कृती आराखडा तयार केला. परंतु या अहवालात १०५ गावातील विहिरी खोल करणे व गाळ काढणे, चार गावातील खासगी विहिरी अधिग्रहित करणे, १०३ गावात नळयोजनांची दुरूस्ती, १३९ गावातील विंधन विहिरींची दुरूस्ती करणे, ४६७ गावात विंधन विहिर घेणे, ५९ गावात कूपनलिका करण्याचे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही.१६३ स्त्रोतांसाठी सूचविल्या उपाययोजनासंभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना केली आहे. भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी यावर्षीच्या उपाययोजनेमध्ये ६१७ गावे प्रस्तावित आहेत. विहिर खोल व विहिरीतील गाळ काढण्यासाठी ७० लाख नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ३८ लाख प्रस्तावित आहेत.जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त आहे. प्रशासनातर्फे उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. सर्वेक्षणानंतर जी कमी खर्चाच्या कामांवर उपाययोजना करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान ३३७, तर एप्रिल ते जून महिन्यामध्ये २८० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे.-विशाल मंत्री, भूवैज्ञानिक,जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीकपात