शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६१७ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे.

ठळक मुद्देसंभाव्य पाणीटंचाई आराखडा : १२ कोटी ९० लाखांची कामे प्रस्तावित

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील एकुण ६१७ गावातील ११६३ स्त्रोतांना पाणीटंचाईची झळ सोसण्याची शक्यता वर्तविली आहे. यावर १२ कोटी ९० लाख ८१ हजार रुपयांची प्रस्तावित उपाययोजना करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे प्रमाण नगण्य आहे. जूनदरम्यान अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे. याचा अनेक नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० चा कृती आराखडा तयार केला. परंतु या अहवालात १०५ गावातील विहिरी खोल करणे व गाळ काढणे, चार गावातील खासगी विहिरी अधिग्रहित करणे, १०३ गावात नळयोजनांची दुरूस्ती, १३९ गावातील विंधन विहिरींची दुरूस्ती करणे, ४६७ गावात विंधन विहिर घेणे, ५९ गावात कूपनलिका करण्याचे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहत असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत बऱ्यापैकी आहे. नळयोजना प्रभावी करण्याची गरज आहे़ पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही.१६३ स्त्रोतांसाठी सूचविल्या उपाययोजनासंभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने उपाययोजना केली आहे. भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी यावर्षीच्या उपाययोजनेमध्ये ६१७ गावे प्रस्तावित आहेत. विहिर खोल व विहिरीतील गाळ काढण्यासाठी ७० लाख नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ३८ लाख प्रस्तावित आहेत.जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त आहे. प्रशासनातर्फे उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. सर्वेक्षणानंतर जी कमी खर्चाच्या कामांवर उपाययोजना करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान ३३७, तर एप्रिल ते जून महिन्यामध्ये २८० गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे.-विशाल मंत्री, भूवैज्ञानिक,जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीकपात