शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

सिंचन विहिरीतूनही सिंचनाला पाणी नाही

By admin | Updated: June 14, 2014 01:40 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर शेतकऱ्यांना बांधून दिल्या जाते.

कोंढा (कोसरा) : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर शेतकऱ्यांना बांधून दिल्या जाते. या पद्धतीत विहिरीचे बांधकाम कंत्राटदारामार्फत केले जात असल्याने बांधकाम निकृष्ट होत आहे. तसेच लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या विहिरीद्वारे किती शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली हा नक्कीच संशोधनाचा विषय ठरणार आहे.भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. धानास मुबलक पाणी पाहिजेत. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोय व्हावी यासाठी सिंचन विहिर योजना सुरू आहे. विहीर बांधकाम मजुरामार्फत करावे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनाच्या माध्यमातून मजुरांना काम मिळावे हा देखील उद्देश आहे. एका विहीर बांधकामासाठी शासनातर्फे दोन लाखाचा निधी मंजूर केला जातो. हे काम ठेकेदार पद्धतीने सुरू आहे. सिंचन विहीर बांधकामास प्रतिनिधीने भेट दिली असता अर्धवट काम केल्याचे निदर्शनास आले.अनेक विहिरींना पाणी लागले नाही. तर पाणी आहे पण एक तासात पाणी आटते. यावरुन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पूर्ण करणाऱ्यास विहिरी असमर्थ आहे. तसे बांधकाम ठेकेदारांनी अर्धवट केले आहे. अनेक ठिकाणी खोदकाम न करताच निधीची उचल करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक विहिरीचे काम झाले. पण त्या विहिरीपासून सिंचनाचे काम होत नाही. यावरुन शासनाचा लाखो रुपयाचा निधी सिंचनाच्या नावाखाली पाण्यात जात असल्याचे लक्षात येते. तरी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन अपूर्ण विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)