शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

६,२८८ हेक्टर क्षेत्रात सिंचन वाढले

By admin | Updated: June 3, 2017 00:15 IST

जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी प्रकल्प आणि विहिरींपासून खरीप, रबी व उन्हाळी हंगामात ७६ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते़...

सिंचनावर कोट्यवधींचा खर्च : देखभाल व दुरूस्तीकडे मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा प्रशासनाने मागीलवर्षी प्रकल्प आणि विहिरींपासून खरीप, रबी व उन्हाळी हंगामात ७६ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते़ प्रत्यक्षात ८२ हजार ८९३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ठरविलेल्या उद्दीष्टापेक्षा ६ हजार २८८ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वाढले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी ८० हजार ६५१ हेक्टर क्षेत्र प्रकल्प आणि विहिरींपासून सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सिंचन सुविधांसाठी कोट्यवधींचा खर्च होत असला तरी त्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.मागीलवर्षी ७४ टक्के पाऊस बरसला़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प आणि विहिरी तुडूंब भरले होते़ मात्र या पाण्याचे नियोजन योग्यरित्या करण्यात आले नाही़ याचा फटका यावर्षीच्या उन्हाळ्यात दिसून आला़ जिल्ह्यात पाणीटंचाई भेडसावत आहे़ शासन आणि प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर पाणी टंचाईचा प्रश्न उद््भवला नसता़ जिल्ह्यात १६ हजार ८१३ प्रकल्पांची संख्या आहे़ यात पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत मोठी बावनथडी आणि पेंच असे दोन मोठे प्रकल्प आहेत़ तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा आणि मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना व एक असे एकुण पाच मध्यम प्रकल्प आहेत़ लघुपाटबंधारे विभागाचे (राज्य) ५९ लघु प्रकल्प आहेत़ आणि एक स्थानिक स्तर प्रकल्प असे ६७ प्रकल्प आहेत. जिल्हा परिषद लघू पाटबंधारे अंतर्गत १४४ तलाव, १,१५४ माजी मालगुजारी तलाव, १७९ कोल्हापुरी बंधारे, ३६६ साठवण बंधारे, ६४६४ विहीरी अशा ८३०७ प्रकल्पांचा समावेश आहे.८३७४ प्रकल्पांपासून सन २०१६-१७ मध्ये मागीलवर्षीच्या खरीप हंगामात ७६,५९० हेक्टर क्षेत्र सिंचनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ७७,५७७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ यात पेंच व मोठे बावनथडी प्रकल्पातून २९,२४२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ याप्रमाणे मध्यम प्रकल्पातून १४,६३७, लघू पाटबंधारे विभाग (राज्य) १३,९२३ हेक्टर, विहिर (राज्य) ५९१ हेक्टर, लघू पाटबंधारे विभाग (जि़प़) २,९१० हेक्टर, मामा तलावांपासून ८६७७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ १७९ कोल्हापुरी बंधारेपासून २५२१ हेक्टर, ३६६ साठवण बंधाऱ्यापासून १५४६ हेक्टर, तर ६४६४ विहिरींपासून ३५३० हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ यावर्षी सन २०१७- १८ च्या खरिप हंगामात जिल्हा प्रशासनाने ८०,६५१ हेक्टर क्षेत्र प्रकल्प आणि विहीरींपासून सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे़ हे उद्दीष्ट ठेवले असले तरी यावर्षी जिल्हा प्रशासन उद्दीष्ट साध्य करील काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ रबी हंगामासाठी मागील वर्षी ८३७४ प्रकल्प सिंचनासाठी ठेवले होते. यात ६४६४ विहिरींची संख्या आहे. या प्रकल्पापासून केवळ १५ हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते़ त्यापैकी ३८४६ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले़ रब्बी हंगामात उद्दीष्टापेक्षा ३ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रात सिंचनामध्ये वाढ झाली आहे. सिंचनासाठी दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळत असतो. परंतु, नियोजनाअभावी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.शाश्वत सिंचनापासून शेतकरी वंचितराष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या गोसेखुर्द (इंदिरासागर) धरणाचे काम पुर्णत्वाला आले असले तरी उजवा व डावा कालवा दुरूस्तीची कामे, उपसा सिंचन योजनेची कामे अपूर्णावस्थेत आहेत. या धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहचविण्यासाठी उजवा व डावा असे दोन्ही मुख्य कालवे बांधण्यात आले. या कालव्यापासून तयार करण्यात आलेले लघु कालवे व वितरिकांचे कामे अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत. ३० किमी.चा उजवा कालवा तयार आहे. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी बांधलेले लघू कालवे व वितरिका अपूर्णावस्थेत असून सदोष बांधकामाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नेरला उपसा सिंचन योजनेचे काम आॅगस्ट २०१६ मध्ये सुरू झाले असून ऊर्वरित कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मागीलवर्षी ३,५०० हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले असले तरी शाश्वत सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही.