शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

शासन मदतीपासून शेतकरी व छोट्या दुकानदारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

लॉकडाऊन काळात शासनाने अंत्योदय लाभार्थींना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मोफत देणार आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना ...

लॉकडाऊन काळात शासनाने अंत्योदय लाभार्थींना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मोफत देणार आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना, नोंदणीकृत बांधकाम मजूर, फेरीवाले, रिक्षावाले यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांना यातून थोडीथोडकी मदत होणार आहेे; पण देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला व शेतमजूर आणि ग्रामीण भागातील लहान-छोटे व्यावसायिक ज्यांचे हातावर आणून पानावर खाण्याची स्थिती आहे, त्यांचा शासनाने कोणताही विचार न केल्याने शेतकरी व ग्रामीण जनतेची शासनाप्रति नाराजी असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ व देशाचा कणा समजला जाणारा शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करतो आहे. त्यातच मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका बसला असून, आजघडीला शेतकरी खचला असला तरी हिमतीने अजूनही परिस्थितीशी लढतोच आहे.

त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने शेताची मशागत करणे मोठी तारेवरची कसरत आहे. कारण मशागतीचे भाव जरी वाढले असले तरी मालाचे भाव १५ वर्षांपूर्वी होते तेच आहेत. आता शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, त्यात सगळ्यात जास्त झळ शेतकरी राजाला बसणार आहे. ते शब्द भाषणापुरतेच असतात का, असा प्रश्न ग्रामीण जनता उपस्थित करीत आहे.

शासनाने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि छोटे दुकानदार, व्यावसायिक यांनाही आर्थिक मदत योजनेत सामावून घेण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांची नोंदणी नगण्य आहे.