शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

महागाईचा ताप; आता कसा घ्यावा वरण-भाताचा घास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:00 IST

डाळ, तांदळाचे भाव वधारले: गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मुख्य खाद्य भात आहे. जिल्ह्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी यंदा पावसाळ्यात महागाईमुळे तांदळाच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी डाळींचे उत्पादन घटल्याने यंदा २० टक्क्यांनी डाळींचे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

गतवर्षी जिल्ह्यात खरीप, रब्बी पिकांवर अतिवृष्टी व किडीचा प्रकोप झाला. परिणामी तांदळाचे व डाळीचे उत्पादन कमालीने घटले. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार २०२२ च्या तुलनेत डाळींच्या उत्पादनात घसरण झाली आहे. परिणामी, मसूर डाळ वगळता इतर डाळींच्या दरांनी यावर्षी शंभरी पार केलेली आहे. गतवर्षीच्या तुनलेत यावर्षी तूरडाळ १४० हून १८० रुपयांवर पोहोचली आहे. मूग ९० रुपयांहून १२० रुपयांवर गेली आहे. 

तसेच हरभरा डाळ ६० रुपयांहून ८० ते ९० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच तांदळाच्या दरातदेखील १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईमुळे रोजच्या जेवणात आवश्यक असणारे वरण-भात खायचा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डाळींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढजिल्ह्यात यंदा पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डाळींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात तूरडाळीची किंमत सर्वाधिक वाढल्याचे दिसते. गतवर्षी १३० ते १४० रुपयांनी मिळणारी तूरडाळ यंदा १८० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे.

तांदळाचे दर प्रतिकिलो     पूर्वीचे                    आताचे               काली मुछ                            ६०                           ८०बासमती                               ८०                          ११०जयश्रीराम                             ६०                          ७०छत्रपती                                ५५                          ६५चिन्नोर                                  ८०                          १२०

डाळींचे दर                  पूर्वीचे                           आताचे तूर                                  १४०                              १८०मुंग                                  ९०                                १२०मसूर                                ८०                                १००हरभरा                             ६०                                 ८०उडीद                             १००                                १४०

गतवर्षी रब्बी हंगामावर अतिवृष्टीचा फटका बसला. पाऊस आणि अवकाळीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे डाळींच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. परिणामी, यावर्षी डाळींचे दर वाढलेले आहेत. तसेच तांदळाच्या दरात देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. - अनिल चरडे, व्यापारी, भंडारा, 

टॅग्स :Inflationमहागाईbhandara-acभंडारा