शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा ताप; आता कसा घ्यावा वरण-भाताचा घास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:00 IST

डाळ, तांदळाचे भाव वधारले: गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मुख्य खाद्य भात आहे. जिल्ह्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी यंदा पावसाळ्यात महागाईमुळे तांदळाच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी डाळींचे उत्पादन घटल्याने यंदा २० टक्क्यांनी डाळींचे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

गतवर्षी जिल्ह्यात खरीप, रब्बी पिकांवर अतिवृष्टी व किडीचा प्रकोप झाला. परिणामी तांदळाचे व डाळीचे उत्पादन कमालीने घटले. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार २०२२ च्या तुलनेत डाळींच्या उत्पादनात घसरण झाली आहे. परिणामी, मसूर डाळ वगळता इतर डाळींच्या दरांनी यावर्षी शंभरी पार केलेली आहे. गतवर्षीच्या तुनलेत यावर्षी तूरडाळ १४० हून १८० रुपयांवर पोहोचली आहे. मूग ९० रुपयांहून १२० रुपयांवर गेली आहे. 

तसेच हरभरा डाळ ६० रुपयांहून ८० ते ९० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच तांदळाच्या दरातदेखील १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईमुळे रोजच्या जेवणात आवश्यक असणारे वरण-भात खायचा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डाळींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढजिल्ह्यात यंदा पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डाळींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात तूरडाळीची किंमत सर्वाधिक वाढल्याचे दिसते. गतवर्षी १३० ते १४० रुपयांनी मिळणारी तूरडाळ यंदा १८० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे.

तांदळाचे दर प्रतिकिलो     पूर्वीचे                    आताचे               काली मुछ                            ६०                           ८०बासमती                               ८०                          ११०जयश्रीराम                             ६०                          ७०छत्रपती                                ५५                          ६५चिन्नोर                                  ८०                          १२०

डाळींचे दर                  पूर्वीचे                           आताचे तूर                                  १४०                              १८०मुंग                                  ९०                                १२०मसूर                                ८०                                १००हरभरा                             ६०                                 ८०उडीद                             १००                                १४०

गतवर्षी रब्बी हंगामावर अतिवृष्टीचा फटका बसला. पाऊस आणि अवकाळीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे डाळींच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. परिणामी, यावर्षी डाळींचे दर वाढलेले आहेत. तसेच तांदळाच्या दरात देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. - अनिल चरडे, व्यापारी, भंडारा, 

टॅग्स :Inflationमहागाईbhandara-acभंडारा