शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महागाईचा ताप; आता कसा घ्यावा वरण-भाताचा घास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:00 IST

डाळ, तांदळाचे भाव वधारले: गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मुख्य खाद्य भात आहे. जिल्ह्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी यंदा पावसाळ्यात महागाईमुळे तांदळाच्या दरात गतवर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी डाळींचे उत्पादन घटल्याने यंदा २० टक्क्यांनी डाळींचे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

गतवर्षी जिल्ह्यात खरीप, रब्बी पिकांवर अतिवृष्टी व किडीचा प्रकोप झाला. परिणामी तांदळाचे व डाळीचे उत्पादन कमालीने घटले. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार २०२२ च्या तुलनेत डाळींच्या उत्पादनात घसरण झाली आहे. परिणामी, मसूर डाळ वगळता इतर डाळींच्या दरांनी यावर्षी शंभरी पार केलेली आहे. गतवर्षीच्या तुनलेत यावर्षी तूरडाळ १४० हून १८० रुपयांवर पोहोचली आहे. मूग ९० रुपयांहून १२० रुपयांवर गेली आहे. 

तसेच हरभरा डाळ ६० रुपयांहून ८० ते ९० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच तांदळाच्या दरातदेखील १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईमुळे रोजच्या जेवणात आवश्यक असणारे वरण-भात खायचा की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डाळींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढजिल्ह्यात यंदा पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डाळींच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात तूरडाळीची किंमत सर्वाधिक वाढल्याचे दिसते. गतवर्षी १३० ते १४० रुपयांनी मिळणारी तूरडाळ यंदा १८० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे.

तांदळाचे दर प्रतिकिलो     पूर्वीचे                    आताचे               काली मुछ                            ६०                           ८०बासमती                               ८०                          ११०जयश्रीराम                             ६०                          ७०छत्रपती                                ५५                          ६५चिन्नोर                                  ८०                          १२०

डाळींचे दर                  पूर्वीचे                           आताचे तूर                                  १४०                              १८०मुंग                                  ९०                                १२०मसूर                                ८०                                १००हरभरा                             ६०                                 ८०उडीद                             १००                                १४०

गतवर्षी रब्बी हंगामावर अतिवृष्टीचा फटका बसला. पाऊस आणि अवकाळीमुळे डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे डाळींच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. परिणामी, यावर्षी डाळींचे दर वाढलेले आहेत. तसेच तांदळाच्या दरात देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. - अनिल चरडे, व्यापारी, भंडारा, 

टॅग्स :Inflationमहागाईbhandara-acभंडारा