शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बाजारात सौंदर्यालाच महत्व... तरुणांना कशी बायको हवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 13:48 IST

प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. तर, मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे.

भंडारा : ‘गाेरी बायकाे पाहिजे,’ असा मथळा असलेल्या जाहिराती आजकाल येत नसल्या तरी मजकुरात मात्र बायकाे गाैरवर्ण लिहून गाेरी बायकाेच हवी, अशी अपेक्षा असते. लग्नाच्या मंडपातही गाेऱ्यांनाच अधिक भाव दिसताे.

उष्ण कटिबंधातील व्यक्ती या बहुतांश सावळ्या किंवा काळ्या वर्ण असलेल्या असतात. त्यामुळेच प्रत्येकाला गाेऱ्या रंगाचे आकर्षण असते. प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. भंडारा शहरातील बहुतांश तरुणांनाही लग्नासाठी मुलगी गाेरीच हवी असल्याचे दिसून येते.

लग्नासाठी मुलीच्या काय अपेक्षा?

मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे.

नवरा गाेरा नसला तरी सुस्वरूप असावा. त्याला काेणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.

लग्नासाठी मुलाच्या काय अपेक्षा?

पत्नी म्हणून घरी येणारी मुलगी कमावती असावा. सर्व घर सांभाळून घेणारी असावी.

माता-पित्यांची सेवा करणारी असावी. आहे त्या परिस्थितीत संसार चालविणारी असावी.

रंग आणि नोकरी महत्त्वाचे

गाेऱ्या रंगाची सर्वांनाच भुरळ पडलेली दिसते; परंतु एखादी मुलगी गलेलठ्ठ नाेकरी करणारी असेल तर तिचा रंग पैशापुढे फिका पडताे. मुलींना मात्र आपला जाेडीदार शासकीय नाेकरी करणाराच हवा असताे.

वधू-वर सूचक मंडळ काय म्हणतात...

आमच्या वधू-वर सूचक मंडळात नाव नाेंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक तरुणाला गाैरवर्णीय तरुणीच हवी असते. काही जण तडजाेड करून निमगाेरी चालेल असे म्हणतात; पंरतु शिकलेली आणि सुसंस्कृत मुलगी हवी असते. मुलींचे पालक जेव्हा नाेंदणी करण्यासाठी येतात. तेव्हा बहुतांश पालकांना आपला जावई शासकीय नाेकरीवालाच हवा असताे. त्यातही पुण्या-मुंबईत नाेकरी करणारा मुलगा हवा असताे. स्वत:चे घराची अपेक्षा असते.

तरुण म्हणतात...

महागाईच्या काळात एकट्याच्या पगारात घर सांभाळणे कठीण जाते. त्यासाठी पत्नीही नाेकरी करणारी असावी. नाेकरी करीत नसेल तर फावल्या वेळात एखादा उद्याेग करून घरखर्चाला हातभार लावणारी असावी.

- भास्कर कुंभारे, भंडारा

काळ्या रंगाला आपण बदनाम करून ठेवल. दुसरीकडे गाेऱ्या रंगालाच प्रतिष्ठा आहे. रंगापेक्षा स्वभावाला महत्त्व गरजेचे आहे. कारण आयुष्यभर दाेघांना एकत्र राहायचे असते. समजूतदारपणा महत्त्वाचा असताे.

- अतुल लिमजे, भंडारा

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक