शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

लग्नाच्या बाजारात सौंदर्यालाच महत्व... तरुणांना कशी बायको हवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 13:48 IST

प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. तर, मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे.

भंडारा : ‘गाेरी बायकाे पाहिजे,’ असा मथळा असलेल्या जाहिराती आजकाल येत नसल्या तरी मजकुरात मात्र बायकाे गाैरवर्ण लिहून गाेरी बायकाेच हवी, अशी अपेक्षा असते. लग्नाच्या मंडपातही गाेऱ्यांनाच अधिक भाव दिसताे.

उष्ण कटिबंधातील व्यक्ती या बहुतांश सावळ्या किंवा काळ्या वर्ण असलेल्या असतात. त्यामुळेच प्रत्येकाला गाेऱ्या रंगाचे आकर्षण असते. प्रत्येक तरुणाला आपली बायकाे गाेरीच हवी, अशी अपेक्षा असते. भंडारा शहरातील बहुतांश तरुणांनाही लग्नासाठी मुलगी गाेरीच हवी असल्याचे दिसून येते.

लग्नासाठी मुलीच्या काय अपेक्षा?

मुलगा नाेकरीवर असावा. त्यातही ताे शासकीय नाेकरीवाला असावा, अशी बहुतांश मुलींची अपेक्षा आहे.

नवरा गाेरा नसला तरी सुस्वरूप असावा. त्याला काेणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.

लग्नासाठी मुलाच्या काय अपेक्षा?

पत्नी म्हणून घरी येणारी मुलगी कमावती असावा. सर्व घर सांभाळून घेणारी असावी.

माता-पित्यांची सेवा करणारी असावी. आहे त्या परिस्थितीत संसार चालविणारी असावी.

रंग आणि नोकरी महत्त्वाचे

गाेऱ्या रंगाची सर्वांनाच भुरळ पडलेली दिसते; परंतु एखादी मुलगी गलेलठ्ठ नाेकरी करणारी असेल तर तिचा रंग पैशापुढे फिका पडताे. मुलींना मात्र आपला जाेडीदार शासकीय नाेकरी करणाराच हवा असताे.

वधू-वर सूचक मंडळ काय म्हणतात...

आमच्या वधू-वर सूचक मंडळात नाव नाेंदणीसाठी येणाऱ्या प्रत्येक तरुणाला गाैरवर्णीय तरुणीच हवी असते. काही जण तडजाेड करून निमगाेरी चालेल असे म्हणतात; पंरतु शिकलेली आणि सुसंस्कृत मुलगी हवी असते. मुलींचे पालक जेव्हा नाेंदणी करण्यासाठी येतात. तेव्हा बहुतांश पालकांना आपला जावई शासकीय नाेकरीवालाच हवा असताे. त्यातही पुण्या-मुंबईत नाेकरी करणारा मुलगा हवा असताे. स्वत:चे घराची अपेक्षा असते.

तरुण म्हणतात...

महागाईच्या काळात एकट्याच्या पगारात घर सांभाळणे कठीण जाते. त्यासाठी पत्नीही नाेकरी करणारी असावी. नाेकरी करीत नसेल तर फावल्या वेळात एखादा उद्याेग करून घरखर्चाला हातभार लावणारी असावी.

- भास्कर कुंभारे, भंडारा

काळ्या रंगाला आपण बदनाम करून ठेवल. दुसरीकडे गाेऱ्या रंगालाच प्रतिष्ठा आहे. रंगापेक्षा स्वभावाला महत्त्व गरजेचे आहे. कारण आयुष्यभर दाेघांना एकत्र राहायचे असते. समजूतदारपणा महत्त्वाचा असताे.

- अतुल लिमजे, भंडारा

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक