शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:13 IST

नदीत पाणी आणि गावात पाण्यासाठी होतेय बोंब : ५ वर्षांपासून वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरासाठी भविष्यकालीन नियोजन लक्षात घेत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र यातील तांत्रिक कामे अजुनही पूर्णत्वास गेलेले नाही. परिणामी भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत १३९ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. गाजावाजा करून योजनेच्या कामाला प्रारंभही झाला. नवीन चार जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तापित करण्याचे ठरविण्यात आले. त्यादिशेने कामेही झाले. एक जलकुंभाचे काम वगळता अन्य कामे पूर्ण झाली. मात्र शहरातील काही भागात जलवाहिनी घालण्याचे काम आजही सुरू आहे. ते पुर्णत्वास कधी जाणार याबाबत नेमके कुणीही सांगायला तयार नाही. 

जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्रवाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत भंडारा शहरातील विविध भागांसाठी जलकुंभ बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी तीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका टाकीचे बांधकाम आजही रखडले आहेत. दरम्यान पाणी समस्या असलेल्या भागात जलकुंभबांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

आजही होतोय दूषीत पाणीपुरवठाभंडारा शहरातील जुनी जलवाहिनी कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे गत दीड दशकांपासून शहरात दूषीत पाणीपुरवठा होत आहे. आजही शहरातील अनेक भागात पिवळसर व काळे पाणी येत आहे. यावर अजुनही तोडगा निघालेला नाही. परिणामी आरोग्याचा प्रश्न बळावला आहे.

उंचभागात पाणी पोहचेनाशहरातील उंच भागात पाणी योग्य प्रमाणात पोहचत नसल्याची नागरिकांची जुनी तक्रार आहे. ती आजही कायम आहे. परिणामी याबाबीला हेरून त्या भागात नवीन जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले. मात्र जलकुंभ एक आणि नळजोडणी अनेक यामुळे पाणीपुरवठा होत असला तरी मिळणारे पाणी अल्प असल्याची बोंब आहे. विशेष करून उंच भागात पाण्याचा प्रवाह कमी होतो. अशावेळी टिल्लूपंप लावून पाणी ओढणारे नागरिक आहेत. त्यामुळे अन्य घरांना कमी प्रमाणात पाणी मिळते. तकिया वॉर्डाला लागून असलेल्या आनंदनगर, समृद्धीनगर परिसर पाणी अल्प प्रमाणात मिळत असल्याची ओरड आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराwater scarcityपाणी टंचाई