शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वाढीव पाणीपुरवठा अंमलात येईना ! भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:13 IST

नदीत पाणी आणि गावात पाण्यासाठी होतेय बोंब : ५ वर्षांपासून वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरासाठी भविष्यकालीन नियोजन लक्षात घेत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली. मात्र यातील तांत्रिक कामे अजुनही पूर्णत्वास गेलेले नाही. परिणामी भंडारेकरांना शुद्ध पाणी मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत १३९ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. गाजावाजा करून योजनेच्या कामाला प्रारंभही झाला. नवीन चार जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तापित करण्याचे ठरविण्यात आले. त्यादिशेने कामेही झाले. एक जलकुंभाचे काम वगळता अन्य कामे पूर्ण झाली. मात्र शहरातील काही भागात जलवाहिनी घालण्याचे काम आजही सुरू आहे. ते पुर्णत्वास कधी जाणार याबाबत नेमके कुणीही सांगायला तयार नाही. 

जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्रवाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत भंडारा शहरातील विविध भागांसाठी जलकुंभ बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी तीन जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. तर एका टाकीचे बांधकाम आजही रखडले आहेत. दरम्यान पाणी समस्या असलेल्या भागात जलकुंभबांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

आजही होतोय दूषीत पाणीपुरवठाभंडारा शहरातील जुनी जलवाहिनी कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे गत दीड दशकांपासून शहरात दूषीत पाणीपुरवठा होत आहे. आजही शहरातील अनेक भागात पिवळसर व काळे पाणी येत आहे. यावर अजुनही तोडगा निघालेला नाही. परिणामी आरोग्याचा प्रश्न बळावला आहे.

उंचभागात पाणी पोहचेनाशहरातील उंच भागात पाणी योग्य प्रमाणात पोहचत नसल्याची नागरिकांची जुनी तक्रार आहे. ती आजही कायम आहे. परिणामी याबाबीला हेरून त्या भागात नवीन जलकुंभ प्रस्तावित करण्यात आले. मात्र जलकुंभ एक आणि नळजोडणी अनेक यामुळे पाणीपुरवठा होत असला तरी मिळणारे पाणी अल्प असल्याची बोंब आहे. विशेष करून उंच भागात पाण्याचा प्रवाह कमी होतो. अशावेळी टिल्लूपंप लावून पाणी ओढणारे नागरिक आहेत. त्यामुळे अन्य घरांना कमी प्रमाणात पाणी मिळते. तकिया वॉर्डाला लागून असलेल्या आनंदनगर, समृद्धीनगर परिसर पाणी अल्प प्रमाणात मिळत असल्याची ओरड आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडाराwater scarcityपाणी टंचाई