शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वाढली चिंता; उकाडा वाढला

By admin | Updated: September 8, 2015 00:34 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे.

दुष्काळसदृश स्थिती : मान्सून परतीच्या मार्गावर, पाऊस बेपत्ता, किडीचा प्रादुर्भाव, भारनियमनाच्या चक्रव्यूहात शेतकरीभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)१.६३ लाख हेक्टरवर करपाचा प्रादुर्भावभंडारा : जिल्ह्यात भात पिकावर करपा, खोडकिडा आदी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. जिल्हयातील १ लाख ६३ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली. या लागवड क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. महागडी औषधी खरेदी करुन कीड, रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.कीड नियंत्रक व कीड सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही गावात करपा रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसून आलेले आहे. हा रोग बुरशीपासून होतो. या रोगाच्या प्रादुर्भावास ढगाळ वातावरण, दमटपणा व कमी उष्ण हवामान म्हणजे २४ ते २६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल ठरते. त्यामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखडी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात. लोंबीच्या दांड्यावरही हा रोग होतो. त्यामुळे दांडा कुजतो. यास मानमोडी असेही म्हणतात. रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोग आढळल्यास नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, शेतातील रोगग्रस्त धसकटे व तणांचा नायनाट करावा, शेणखताचा वापर करावा, ट्रायसायक्लोझोल ७५ डब्लू पी ०.६ ग्रॅम प्रती लिटर किंवा इप्रोबेनफॉस ४८ इसी २ ग्रॅम प्रती लिटरकिंवा आयसोप्रोथीओलीन ४० इसी १.५ मिली प्रती लिटर किंवा कारप्रोपॅमीड ३० एससी १ मिली प्रती लिटर किंवा कार्बन डॅझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रती लिटर किंवा कासूगामायसीन ३ एसएल २.५ ग्रॅम प्रती लिटर यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी, अशी उपाययोजना कृषी विभागाचे भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी सुचविल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)