शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

शेतकऱ्यांची वाढली चिंता; उकाडा वाढला

By admin | Updated: September 8, 2015 00:34 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे.

दुष्काळसदृश स्थिती : मान्सून परतीच्या मार्गावर, पाऊस बेपत्ता, किडीचा प्रादुर्भाव, भारनियमनाच्या चक्रव्यूहात शेतकरीभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)१.६३ लाख हेक्टरवर करपाचा प्रादुर्भावभंडारा : जिल्ह्यात भात पिकावर करपा, खोडकिडा आदी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. जिल्हयातील १ लाख ६३ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली. या लागवड क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. महागडी औषधी खरेदी करुन कीड, रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.कीड नियंत्रक व कीड सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही गावात करपा रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसून आलेले आहे. हा रोग बुरशीपासून होतो. या रोगाच्या प्रादुर्भावास ढगाळ वातावरण, दमटपणा व कमी उष्ण हवामान म्हणजे २४ ते २६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल ठरते. त्यामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखडी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात. लोंबीच्या दांड्यावरही हा रोग होतो. त्यामुळे दांडा कुजतो. यास मानमोडी असेही म्हणतात. रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोग आढळल्यास नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, शेतातील रोगग्रस्त धसकटे व तणांचा नायनाट करावा, शेणखताचा वापर करावा, ट्रायसायक्लोझोल ७५ डब्लू पी ०.६ ग्रॅम प्रती लिटर किंवा इप्रोबेनफॉस ४८ इसी २ ग्रॅम प्रती लिटरकिंवा आयसोप्रोथीओलीन ४० इसी १.५ मिली प्रती लिटर किंवा कारप्रोपॅमीड ३० एससी १ मिली प्रती लिटर किंवा कार्बन डॅझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रती लिटर किंवा कासूगामायसीन ३ एसएल २.५ ग्रॅम प्रती लिटर यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी, अशी उपाययोजना कृषी विभागाचे भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी सुचविल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)