शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

शेतकऱ्यांची वाढली चिंता; उकाडा वाढला

By admin | Updated: September 8, 2015 00:34 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे.

दुष्काळसदृश स्थिती : मान्सून परतीच्या मार्गावर, पाऊस बेपत्ता, किडीचा प्रादुर्भाव, भारनियमनाच्या चक्रव्यूहात शेतकरीभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)१.६३ लाख हेक्टरवर करपाचा प्रादुर्भावभंडारा : जिल्ह्यात भात पिकावर करपा, खोडकिडा आदी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. जिल्हयातील १ लाख ६३ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली. या लागवड क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. महागडी औषधी खरेदी करुन कीड, रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.कीड नियंत्रक व कीड सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही गावात करपा रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसून आलेले आहे. हा रोग बुरशीपासून होतो. या रोगाच्या प्रादुर्भावास ढगाळ वातावरण, दमटपणा व कमी उष्ण हवामान म्हणजे २४ ते २६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल ठरते. त्यामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखडी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात. लोंबीच्या दांड्यावरही हा रोग होतो. त्यामुळे दांडा कुजतो. यास मानमोडी असेही म्हणतात. रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोग आढळल्यास नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, शेतातील रोगग्रस्त धसकटे व तणांचा नायनाट करावा, शेणखताचा वापर करावा, ट्रायसायक्लोझोल ७५ डब्लू पी ०.६ ग्रॅम प्रती लिटर किंवा इप्रोबेनफॉस ४८ इसी २ ग्रॅम प्रती लिटरकिंवा आयसोप्रोथीओलीन ४० इसी १.५ मिली प्रती लिटर किंवा कारप्रोपॅमीड ३० एससी १ मिली प्रती लिटर किंवा कार्बन डॅझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रती लिटर किंवा कासूगामायसीन ३ एसएल २.५ ग्रॅम प्रती लिटर यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी, अशी उपाययोजना कृषी विभागाचे भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी सुचविल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)