शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकऱ्यांची वाढली चिंता; उकाडा वाढला

By admin | Updated: September 8, 2015 00:34 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे.

दुष्काळसदृश स्थिती : मान्सून परतीच्या मार्गावर, पाऊस बेपत्ता, किडीचा प्रादुर्भाव, भारनियमनाच्या चक्रव्यूहात शेतकरीभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. आठवडाभरापासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. १ लाख ८२ हजार ६७० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९१ टक्के एवढी आहे. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के म्हणजेच १ लक्ष ६३ हजार ८८३ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे. पंधरा दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे. मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. (नगर प्रतिनिधी)१.६३ लाख हेक्टरवर करपाचा प्रादुर्भावभंडारा : जिल्ह्यात भात पिकावर करपा, खोडकिडा आदी किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. जिल्हयातील १ लाख ६३ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रात धान पिकांची लागवड करण्यात आली. या लागवड क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. महागडी औषधी खरेदी करुन कीड, रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.कीड नियंत्रक व कीड सर्वेक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, लाखांदूर, साकोली, लाखनी, तुमसर व पवनी तालुक्यातील काही गावात करपा रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या जवळपास दिसून आलेले आहे. हा रोग बुरशीपासून होतो. या रोगाच्या प्रादुर्भावास ढगाळ वातावरण, दमटपणा व कमी उष्ण हवामान म्हणजे २४ ते २६ अंश सेल्सीअस तापमान अनुकूल ठरते. त्यामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखडी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात. लोंबीच्या दांड्यावरही हा रोग होतो. त्यामुळे दांडा कुजतो. यास मानमोडी असेही म्हणतात. रोगाच्या नियंत्रणासाठी करपा रोग आढळल्यास नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा, शेतातील रोगग्रस्त धसकटे व तणांचा नायनाट करावा, शेणखताचा वापर करावा, ट्रायसायक्लोझोल ७५ डब्लू पी ०.६ ग्रॅम प्रती लिटर किंवा इप्रोबेनफॉस ४८ इसी २ ग्रॅम प्रती लिटरकिंवा आयसोप्रोथीओलीन ४० इसी १.५ मिली प्रती लिटर किंवा कारप्रोपॅमीड ३० एससी १ मिली प्रती लिटर किंवा कार्बन डॅझीम ५० डब्लूपी १ ग्रॅम प्रती लिटर किंवा कासूगामायसीन ३ एसएल २.५ ग्रॅम प्रती लिटर यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी, अशी उपाययोजना कृषी विभागाचे भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे यांनी सुचविल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)