शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा; उन्हाळ्यात किडनी स्टोन होण्याचा असतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:03 IST

२० टक्के पाणी मिळते अन्नातून : कमी पाणी प्यायल्याने लघवीचे इन्फेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ठरावीक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात झाले तर त्याचे वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते. परंतु, पाणी घाम, मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. व्यायाम किंवा उष्णतेमुळे होणाऱ्या डीहायड्रेशनमुळे आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे डीहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.

दोन लिटर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यतः आरोग्यतज्ज्ञ देतात. तहान नसतानाही दिवसभर पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, यासंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टीप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे यासंदर्भातही आरोग्यतज्ज्ञ सल्ला देतात.

उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?उन्हाळ्याच्या दिवसांत गरम वातावरण असले, तरी सामान्यतः दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लिटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे.

शरीरात जास्त पाणी झाले तरप्रत्येक व्यक्तीने भरपूर पाणी प्यावे, अशी काही गरज नाही. वैद्यकशास्त्रानुसार प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज ५ ते ६ लिटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे. यामुळे अनेक आजार होतात. जास्त पाणी सेवनानेही किडनी फेल होण्याची शक्यता असते.

"२० टक्के पाणी अन्नापासून, तर ८० टक्के पाणी पिण्यातून शरीराला मिळते. दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी प्यायल्याने लघुशंकेतून शरीरातील मळ बाहेर पडतो. त्यामुळे माणूस दिवसभर ताजातवाना राहतो. यासाठी पाणी अधिक घ्यावे."- डॉ. नितीन तुरस्कर, भंडारा

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सbhandara-acभंडारा