शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:30 IST

करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : १५ टक्के राखीव जलसाठा, एका तलावापासून पाच लाखांपर्यंतचे उत्पादनाचा लक्षांक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीही १० किलो मत्स्य जिऱ्यांपासून एकाच १७ एकराच्या तलावात ५ लाखांचे मासोळ्यांचे उत्पादन हाती पडणार असल्याचे मनोगत ढिवरबांधवांनी व्यक्त केले आहेत. करडी परिसरात जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये ल.पा. व मामा तलाव दुरुस्तीची ५ कामे झाली. तर जलसंधारण विभागाचे वतीने ल.पा. व मामा तलावांचे २ कामे झालीत. सन २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव (करडी), बोरी-पांजरा, देव्हाडा बुज., नरसिंगोला आदी गावात जलयुक्तची कामे झालीत तर सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रुपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज., जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे २००१.३ टीसीएम जलसाठा तयार होवून सुमारे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.करडी परिसरातील सर्व तलाव कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असल्याने जंगलातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठविले गेले. साठलेल्या पाण्याचा उपयोग ढिवरबांधवांसाठी वरदान ठरले. केसलवाडा, जांभोरा टोला व करडी गावातील मत्स्य उत्पादक सहकारी संस्थांनी तलावांची क्षमता ओळखून रोहा, कतला, काटवे, मिरगल, सिपनस, वाघुळ आदी मासोळ्यांचे मत्स्य जिरे टाकले. नैसर्गिक गवत व हिरवा चारा तलावात उगवल्याने तसेच जास्त काळ पाणी साठा राहिल्याने मागील वर्षीपासून मासोळ्यांचे वरघोष उत्पन्न हाती पडत आहे. यावर्षी केसलवाडा येथील ढिवरबांधवांनी पालोरा येथील १७ एकरमध्ये विस्तारलेल्या बांध तलावात १० किलो मत्स्य जिऱ्यांचा चांगला विस्तार झालेला आहे. मासेमारीतून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा विश्वास ढिवरबांधवांनी व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पालोरा, करडी व जांभोरा जंगल परिसरातील तलावांचे एक ती दीड मिटरपर्यंत खोलीकरण झाले. यामुळे मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यावर्षी बांध तलावातील १० किलो मत्स्य जिऱ्यापासून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपासून मासोळ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आहे.