शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:30 IST

करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : १५ टक्के राखीव जलसाठा, एका तलावापासून पाच लाखांपर्यंतचे उत्पादनाचा लक्षांक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीही १० किलो मत्स्य जिऱ्यांपासून एकाच १७ एकराच्या तलावात ५ लाखांचे मासोळ्यांचे उत्पादन हाती पडणार असल्याचे मनोगत ढिवरबांधवांनी व्यक्त केले आहेत. करडी परिसरात जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये ल.पा. व मामा तलाव दुरुस्तीची ५ कामे झाली. तर जलसंधारण विभागाचे वतीने ल.पा. व मामा तलावांचे २ कामे झालीत. सन २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव (करडी), बोरी-पांजरा, देव्हाडा बुज., नरसिंगोला आदी गावात जलयुक्तची कामे झालीत तर सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रुपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज., जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे २००१.३ टीसीएम जलसाठा तयार होवून सुमारे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.करडी परिसरातील सर्व तलाव कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असल्याने जंगलातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठविले गेले. साठलेल्या पाण्याचा उपयोग ढिवरबांधवांसाठी वरदान ठरले. केसलवाडा, जांभोरा टोला व करडी गावातील मत्स्य उत्पादक सहकारी संस्थांनी तलावांची क्षमता ओळखून रोहा, कतला, काटवे, मिरगल, सिपनस, वाघुळ आदी मासोळ्यांचे मत्स्य जिरे टाकले. नैसर्गिक गवत व हिरवा चारा तलावात उगवल्याने तसेच जास्त काळ पाणी साठा राहिल्याने मागील वर्षीपासून मासोळ्यांचे वरघोष उत्पन्न हाती पडत आहे. यावर्षी केसलवाडा येथील ढिवरबांधवांनी पालोरा येथील १७ एकरमध्ये विस्तारलेल्या बांध तलावात १० किलो मत्स्य जिऱ्यांचा चांगला विस्तार झालेला आहे. मासेमारीतून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा विश्वास ढिवरबांधवांनी व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पालोरा, करडी व जांभोरा जंगल परिसरातील तलावांचे एक ती दीड मिटरपर्यंत खोलीकरण झाले. यामुळे मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यावर्षी बांध तलावातील १० किलो मत्स्य जिऱ्यापासून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपासून मासोळ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आहे.