शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तलावांच्या खोलीकरणाने मत्स्योत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:30 IST

करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : १५ टक्के राखीव जलसाठा, एका तलावापासून पाच लाखांपर्यंतचे उत्पादनाचा लक्षांक

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरात जलयुक्त शिवार अभियानामुळे फक्त शेतीलाच फायदा झाला नाही तर राखीव जलसाठ्यात १५ टक्क्यांची वाढ झाली. उन्हाळ्यात जनावरांची तहान सुद्धा भागविली जाणार आहे. तलाव खोलीकरण सुमारे एक ते दीड मिटरपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने ढिवर बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीही १० किलो मत्स्य जिऱ्यांपासून एकाच १७ एकराच्या तलावात ५ लाखांचे मासोळ्यांचे उत्पादन हाती पडणार असल्याचे मनोगत ढिवरबांधवांनी व्यक्त केले आहेत. करडी परिसरात जि.प. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०१७-१८ मध्ये ल.पा. व मामा तलाव दुरुस्तीची ५ कामे झाली. तर जलसंधारण विभागाचे वतीने ल.पा. व मामा तलावांचे २ कामे झालीत. सन २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव (करडी), बोरी-पांजरा, देव्हाडा बुज., नरसिंगोला आदी गावात जलयुक्तची कामे झालीत तर सन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रुपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज., जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे २००१.३ टीसीएम जलसाठा तयार होवून सुमारे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.करडी परिसरातील सर्व तलाव कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असल्याने जंगलातील पाणी तलावात मोठ्या प्रमाणात साठविले गेले. साठलेल्या पाण्याचा उपयोग ढिवरबांधवांसाठी वरदान ठरले. केसलवाडा, जांभोरा टोला व करडी गावातील मत्स्य उत्पादक सहकारी संस्थांनी तलावांची क्षमता ओळखून रोहा, कतला, काटवे, मिरगल, सिपनस, वाघुळ आदी मासोळ्यांचे मत्स्य जिरे टाकले. नैसर्गिक गवत व हिरवा चारा तलावात उगवल्याने तसेच जास्त काळ पाणी साठा राहिल्याने मागील वर्षीपासून मासोळ्यांचे वरघोष उत्पन्न हाती पडत आहे. यावर्षी केसलवाडा येथील ढिवरबांधवांनी पालोरा येथील १७ एकरमध्ये विस्तारलेल्या बांध तलावात १० किलो मत्स्य जिऱ्यांचा चांगला विस्तार झालेला आहे. मासेमारीतून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा विश्वास ढिवरबांधवांनी व्यक्त केला आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पालोरा, करडी व जांभोरा जंगल परिसरातील तलावांचे एक ती दीड मिटरपर्यंत खोलीकरण झाले. यामुळे मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यावर्षी बांध तलावातील १० किलो मत्स्य जिऱ्यापासून सुमारे ५ लाखाचे उत्पादन हाती पडण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीपासून मासोळ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झालेली आहे.