शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वैनगंगा पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनिलज-पवनी राज्यमार्गावरील प्रकार : बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : निलज-पवनी-कारधा राज्यमार्गावर वैनगंगेच्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असून नेहमीच होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आठवडाभरातून किमान दोन-तीन अपघाताच्या घटना घडत असतानाही या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे डोळेझाक होत आहे.गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले आहे. याच मार्गावरून अनेकदा जिल्हा परिषद सदस्य, तालुका दंडाधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची ये-जा असते. मात्र तरीदेखील याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद बनल्याने अपघातात वाढ झाली आहे. नेहमीच होणाºया अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद होत नाही. निलज-पवनी-कारधा महामार्गाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांधकामाची गती संथ असल्याने किमान खड्डे बुजविण्याचे काम करीत त्वरीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नेहमीच होणाºया अपघातामुळे आणखी किती बळी प्रशासन घेणार आहे असा संतप्त सवाल वाहनधारक करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात