शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पहाटे उलटला तांदळाचा ट्रक अन् दिवसभर वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:08 IST

भंडारा शहरातील महामार्गावरील घटना : दोनही बाजूंना तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

भंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याचा नेहमीचाच प्रकार असताना शुक्रवारी पहाटे तांदळाचा ट्रक उलटला आणि दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोनही बाजूंना तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने वाहने हळूहळू पुढे सरकत होती. तीन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

तांदळाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यातच नांदेड येथून एक ट्रक पोत्यांममध्ये भरून तांदूळ घेऊन शुक्रवारी येत होता. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण वाहनावरील गेले आणि जिल्हाधिकारी कार्यालयालगत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला. ट्रकमधील तांदळाची पोती रस्त्यावर विखुरली. आधीच दुपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धा भागात हा ट्रक पडून होता. त्यामुळे मार्गावरील वाहतूक मंदावली. पहाटेची वेळ असल्याने तेवढा प्रभाव जाणवला नाही. मात्र, सकाळी ९ वाजतापासून वाहनांच्या दोनही बाजूंना रांगा लागल्या होत्या. त्यातच सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रक उचलण्यासाठी क्रेन आणल्याने तब्बल तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाहतूक सुरू झाली; परंतु अत्यंत कासवगतीने वाहने समोर जात होती. वाहतूक पोलिस खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते.

सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरातील जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक या वर्दळीच्या चौकात मोठी गर्दी दिसत होती. वाहनांच्या रांगा तीन किमीपर्यंत लागलेल्या होत्या. जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख निशांत मेश्राम आणि त्यांचे पथक दिवसभर रस्त्यावर वाहतूक सुरळीत करीत होते. या विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप झाला.

ट्रकला लागला कट अन् चालकांत हाणामारी

भंडारा शहरातून वाहतूक विस्कळीत झाल्याने आधीच वाहनधारक त्रस्त झाले होते. त्यातच भंडारा शहरातील पाटीदार भवनासमोर दुपारी समोरील ट्रकला मागच्या ट्रकचा कट लागला. त्यावरून दोन चालकांत चांगलीच हाणामारी झाली. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोनही वाहनचालकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर एक ट्रक अचानक बंद पडला. त्यामुळे आणखी भर पडली.

नांदेडचा तांदूळ कोठे चालला होता

नांदेडवरून तांदळाचे पोते घेऊन ट्रक राष्ट्रीय महामार्गाने जात होता. भंडारा शहरात उलटल्यानंतर संपूर्ण तांदळाचे पोते रस्त्यावर विखुरले होते. या ट्रकमध्ये राशनचा तांदूळ प्लॉस्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेला होता. भंडारा जिल्हा तांदळाचे कोठार असताना नांदेडवरून हा तांदूळ कशासाठी येत होता हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अनेक राईस मिलर्स परजिल्ह्यातून राशनचा तांदूळ विकत आणून त्याचा शासनाला पुरवठा करीत असल्याचे प्रकरण पुढे आले होते. तोच तर प्रकार नाही ना, अशी चर्चा अपघातस्थही रंगली होती.

टॅग्स :Accidentअपघातbhandara-acभंडारा