शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 13:09 IST

वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भाला पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे३८४ प्रकल्प : सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : वाढत्या तापमानाने पूर्व विदर्भातील प्रकल्पांत गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के जलसाठ्यात घट झाली असून ३० एप्रिल रोजी या प्रकल्पांमध्ये ४०.१८ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ५१.३८ टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ४६०७.०१ दलघमी असून सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भालापाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागात मोठे १६ प्रकल्प असून उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ३४६२.९२ दलघमी आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १३७७.५ दलघमी उपयुक्त जलसाठा असून त्याची टक्केवारी ३९.७७ टक्के आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५५.२९ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ६३५.१६ दलघमी असून या प्रकल्पांत सध्या २५३.२९ टक्के जलसाठा असून गतवर्षी ३४.९ टक्के साठा होता. मध्यम प्रकल्पांची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत चांगली दिसत असली तरी हा पुरेसा साठा नाही. पूर्व विदर्भात ३२७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ५०८.९३ दलघमी असून सध्या २२०.७ दलघमी साठा आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ४३.७४ टक्के आहे. गतवर्षी ४५.३२ टक्के जलसाठा होता. वाढते तापमान आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठ्यात घट होत आहे. उन्हाचा मे महिना आणखी बाकी असल्याने जलसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे.

गोसे प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला होता. सध्या या प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा असून गतवर्षी केवळ १५.०३ टक्के जलसाठा होता. या प्रकल्पाच्या उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ७४०.०७ दलघमी असून मृत साठा क्षमता ४०५.९१ दलघमी अशी एकूण ११४६.०८ दलघमी प्रकल्पीय क्षमता आहे. सध्या या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १९५.८ दलघमी असून एकूण साठा ६०१.०७ दलघमी आहे. यासोबत भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पात सध्या २५.८२ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूरमध्ये केवळ ७.१३ टक्के, इटियाडोहमध्ये २०.८६ टक्के, कालीसरारमध्ये ४३.५८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा प्रकल्पात ४५.५१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील आसोळामेंढामध्ये ६१.८५ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ५८.५६ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भagricultureशेती