शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 13:09 IST

वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भाला पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे३८४ प्रकल्प : सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : वाढत्या तापमानाने पूर्व विदर्भातील प्रकल्पांत गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के जलसाठ्यात घट झाली असून ३० एप्रिल रोजी या प्रकल्पांमध्ये ४०.१८ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ५१.३८ टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ४६०७.०१ दलघमी असून सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भालापाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागात मोठे १६ प्रकल्प असून उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ३४६२.९२ दलघमी आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १३७७.५ दलघमी उपयुक्त जलसाठा असून त्याची टक्केवारी ३९.७७ टक्के आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५५.२९ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ६३५.१६ दलघमी असून या प्रकल्पांत सध्या २५३.२९ टक्के जलसाठा असून गतवर्षी ३४.९ टक्के साठा होता. मध्यम प्रकल्पांची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत चांगली दिसत असली तरी हा पुरेसा साठा नाही. पूर्व विदर्भात ३२७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ५०८.९३ दलघमी असून सध्या २२०.७ दलघमी साठा आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ४३.७४ टक्के आहे. गतवर्षी ४५.३२ टक्के जलसाठा होता. वाढते तापमान आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठ्यात घट होत आहे. उन्हाचा मे महिना आणखी बाकी असल्याने जलसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे.

गोसे प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला होता. सध्या या प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा असून गतवर्षी केवळ १५.०३ टक्के जलसाठा होता. या प्रकल्पाच्या उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ७४०.०७ दलघमी असून मृत साठा क्षमता ४०५.९१ दलघमी अशी एकूण ११४६.०८ दलघमी प्रकल्पीय क्षमता आहे. सध्या या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १९५.८ दलघमी असून एकूण साठा ६०१.०७ दलघमी आहे. यासोबत भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पात सध्या २५.८२ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूरमध्ये केवळ ७.१३ टक्के, इटियाडोहमध्ये २०.८६ टक्के, कालीसरारमध्ये ४३.५८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा प्रकल्पात ४५.५१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील आसोळामेंढामध्ये ६१.८५ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ५८.५६ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भagricultureशेती