शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 13:09 IST

वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भाला पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे३८४ प्रकल्प : सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : वाढत्या तापमानाने पूर्व विदर्भातील प्रकल्पांत गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के जलसाठ्यात घट झाली असून ३० एप्रिल रोजी या प्रकल्पांमध्ये ४०.१८ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ५१.३८ टक्के जलसाठा होता. नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची एकूण क्षमता ४६०७.०१ दलघमी असून सद्यस्थितीत १८५१.१५ दलघमी जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने मे महिन्यात आणखी घट होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भालापाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागात मोठे १६ प्रकल्प असून उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ३४६२.९२ दलघमी आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये १३७७.५ दलघमी उपयुक्त जलसाठा असून त्याची टक्केवारी ३९.७७ टक्के आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५५.२९ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ६३५.१६ दलघमी असून या प्रकल्पांत सध्या २५३.२९ टक्के जलसाठा असून गतवर्षी ३४.९ टक्के साठा होता. मध्यम प्रकल्पांची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत चांगली दिसत असली तरी हा पुरेसा साठा नाही. पूर्व विदर्भात ३२७ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ५०८.९३ दलघमी असून सध्या २२०.७ दलघमी साठा आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ४३.७४ टक्के आहे. गतवर्षी ४५.३२ टक्के जलसाठा होता. वाढते तापमान आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठ्यात घट होत आहे. उन्हाचा मे महिना आणखी बाकी असल्याने जलसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे.

गोसे प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्प यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला होता. सध्या या प्रकल्पात २६.४५ टक्के जलसाठा असून गतवर्षी केवळ १५.०३ टक्के जलसाठा होता. या प्रकल्पाच्या उपयुक्त जलसाठ्याची क्षमता ७४०.०७ दलघमी असून मृत साठा क्षमता ४०५.९१ दलघमी अशी एकूण ११४६.०८ दलघमी प्रकल्पीय क्षमता आहे. सध्या या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १९५.८ दलघमी असून एकूण साठा ६०१.०७ दलघमी आहे. यासोबत भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पात सध्या २५.८२ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूरमध्ये केवळ ७.१३ टक्के, इटियाडोहमध्ये २०.८६ टक्के, कालीसरारमध्ये ४३.५८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील निम्नवर्धा प्रकल्पात ४५.५१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील आसोळामेंढामध्ये ६१.८५ टक्के तर नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पात ५८.५६ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :WaterपाणीVidarbhaविदर्भagricultureशेती