शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:32 IST

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे.

ठळक मुद्दे कातुर्ली येथील प्रकार : वनक्षेत्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, जप्तीचे लाकडे वाऱ्यावर

प्रकाश हातेल।लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे वृक्ष नामशेष होत आहे. वनविभागाला याचा लाखोंचा फटका बसत आहे.पवनी तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगल व्याप्त आहे. तालुक्यात पवनी वनक्षेत्र १६ हजार ३८४ हेक्टर असून अड्याळ, सावरला, नेरला, भुयार, खापरी, केसलवाडा, तिर्री आदी परिसर जंगलव्याप्त आहे. तालुक्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. खरीप हंगामानंतर काहीही काम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील काहीची नजर जंगलातील वृक्षाकडे गेली. जंगलातील मौल्यवान सागवनाची झाडे तोडून त्यांची चिराण करून लाखो रूपयाला विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यात काही वनअधिकाºयाचा मुख्य परवाना असल्याचे सुत्रानी सांगितले. याशिवाय रॉकेल व गॅसच्या किंमती वाढल्याने स्वयंपाकासाठी सरपण आणण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात जंगलात जात असून सरपणाच्या नावावर सागवनाची झाडे तोडली जात आहेत.अड्याळ वनक्षेत्रात तिर्री, कलेवाडा, नेरला, येटेवाही येथे दाट जंगल असून हा परिसर उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याला लागून आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असतो. जवळच्या कातुर्ली येथील समाज मंदिरासमोर सागवान, आंबा, बोर, अंजन, कीन आदी वृक्ष कापून रचून ठेवण्यात आले आहेत. वास्तविकता शेतातील झाड कापल्यानंतर ते विना परवानगीने इतरत्र हलविता येत नाही. परंतु ही सर्व लाकडे विना परवानगीने हलविण्यात आली आहेत. यामध्ये वनअधिकारी व कंत्राटदाराचा संगणमत असतो. घटना स्थळाला वनक्षेत्राधिकाºयांनी भेट देवून तोडलेली लाकडे जप्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जप्ती केलेली लाकडे खुल्या मैदानात पडलेल्या स्थितीत असून चोरीला जाण्याचा प्रकार होत आहे. या लाकडांची योग्य विल्हेवाट लावून कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परिसरात बाभुळ वृक्षाच्या नवाखाली शेत शिवारातील आडजात वृक्षांचीही विना परवाना कंत्राटदार ट्रक, ट्रॅक्टरने, भंडारा, नागपूर, नागभिड येथे अवैध लाकडाची तस्करी करीत आहेत. पहाटे घराबाहेर पडून महिला व पुरूष सरपणाच्या नावाखाली महिला झाडाची कत्तल करून मोळ्या आणतात. पुरूष सागवणाची शेती उपयोगी अवजारासाठी परिसरात पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास सायकलवर विक्री करताना आढळतात. जंगलातील झाडे कापून ते शेतातील झाडांमध्ये मिसळविण्याचा गोरखधंदा भंडारा विभागात अनेक वर्षापासून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.