शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

लाखांदूर तालुक्यात गौण खनिजांचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:13 IST

तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल पाण्यात : झाडांचीही सर्रास कत्तल, वीट भट्टी व्यवसायालाही फटका

आॅनलाईन लोकमतलाखांदुर : तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.विविध विकास कामे करण्यासाठी वाळू, गिट्टी, बोल्डर, आणि मुरुमचा अवैध उत्खनन करून वाहतुक ट्रॅक्टर, बैलगाडी द्वारे केल्या जात आहे. यावर संबंधित विभागाचा नियंत्रण नसल्याने गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे हौसले बुलंद होत आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडत चालला आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबत आहे.तालुक्यातील विविध ठिकाणी वीट भट्टी व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखांदूर तालुका जंगलव्यप्त असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून खुलेआम विक्री होत आहे. सागवान व अन्य बहुउपयोगी झाडाची कत्तल करणारे ठेकेदार लुप्त आहेत.झाडांची होणारी कत्तल पाहता येणाºया दिवसात जंगल फक्त कागदावरच दिसणार की काय..? असे प्रश्न निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झाडाची कत्तली मुळे जंगलातील वनस्पती, औषधी आणि बहुउपयोगी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तरी देखील वनविभाग या घटनेला गंभीर घेत नाही आहे. लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली, गवराळा, मोहरना, इटान, नांदेड यासह अन्य गावात लावण्यात आलेली रोपवन नष्ट होत असून, रोपवणाच्या जागेवरच अतिक्रमण होत आहे मात्र संबंधित विभाग डोळे मिटून बसला आहे.शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात, ग्रामपंचायत, नगरपंचायतला झाडे वितरित करून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केल्या गेले व या योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला मात्र यातून लावण्यात आलेले झाडांची स्थिती खूप बिकट आहे. या झाडांची देखभाल कोण करील मग या लागवडीचा फायदा काय..? असे सवाल नागरिक करीत आहेत.विट व्यवसाय करण्यासाठी मातीचा उत्खनन, विकास कामासाठी वाळु, गिट्टी, मुरूम, बोल्डर उत्खनन, जंगलातील झाडांची कत्तल, होत असल्याने पर्यावरण खराब होत आहे आणि अनेक समस्या तालुक्यात उद्भवत आहेत. तापमान वाढत चालले आहे पाण्याची पातळी कमी झाली असल्याने लाखांदूर तालुका पूर्णत: नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर जात आहे. गौण खनिज उत्खनन वाहतूक, आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्राकृतिक संतुलन बिघडत चालला आहे त्यामुळे या परिस्थितीला सुधारण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.