शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात गौण खनिजांचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:13 IST

तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल पाण्यात : झाडांचीही सर्रास कत्तल, वीट भट्टी व्यवसायालाही फटका

आॅनलाईन लोकमतलाखांदुर : तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.विविध विकास कामे करण्यासाठी वाळू, गिट्टी, बोल्डर, आणि मुरुमचा अवैध उत्खनन करून वाहतुक ट्रॅक्टर, बैलगाडी द्वारे केल्या जात आहे. यावर संबंधित विभागाचा नियंत्रण नसल्याने गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे हौसले बुलंद होत आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडत चालला आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबत आहे.तालुक्यातील विविध ठिकाणी वीट भट्टी व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखांदूर तालुका जंगलव्यप्त असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून खुलेआम विक्री होत आहे. सागवान व अन्य बहुउपयोगी झाडाची कत्तल करणारे ठेकेदार लुप्त आहेत.झाडांची होणारी कत्तल पाहता येणाºया दिवसात जंगल फक्त कागदावरच दिसणार की काय..? असे प्रश्न निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झाडाची कत्तली मुळे जंगलातील वनस्पती, औषधी आणि बहुउपयोगी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तरी देखील वनविभाग या घटनेला गंभीर घेत नाही आहे. लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली, गवराळा, मोहरना, इटान, नांदेड यासह अन्य गावात लावण्यात आलेली रोपवन नष्ट होत असून, रोपवणाच्या जागेवरच अतिक्रमण होत आहे मात्र संबंधित विभाग डोळे मिटून बसला आहे.शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात, ग्रामपंचायत, नगरपंचायतला झाडे वितरित करून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केल्या गेले व या योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला मात्र यातून लावण्यात आलेले झाडांची स्थिती खूप बिकट आहे. या झाडांची देखभाल कोण करील मग या लागवडीचा फायदा काय..? असे सवाल नागरिक करीत आहेत.विट व्यवसाय करण्यासाठी मातीचा उत्खनन, विकास कामासाठी वाळु, गिट्टी, मुरूम, बोल्डर उत्खनन, जंगलातील झाडांची कत्तल, होत असल्याने पर्यावरण खराब होत आहे आणि अनेक समस्या तालुक्यात उद्भवत आहेत. तापमान वाढत चालले आहे पाण्याची पातळी कमी झाली असल्याने लाखांदूर तालुका पूर्णत: नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर जात आहे. गौण खनिज उत्खनन वाहतूक, आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्राकृतिक संतुलन बिघडत चालला आहे त्यामुळे या परिस्थितीला सुधारण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.