शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. ...

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनावर मास्क हेच प्रभावी औषध असल्याचे वारंवार सांगूनही सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. हे जबाबदार नागरिकाचे वर्तन नसून यामुळे आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे अन्य जिल्ह्यात प्रशासनाला नाईलाजाने टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना टाळेबंदी नको असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.

कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, बाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे. धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी किंवा इतर कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पाडावेत, वारंवार उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे तथा प्रत्येक बाबीसाठी निर्गमित आदेश, परिपत्रक व प्रमाणित कार्यप्रणालीची कडक अंमलबजावणी करावी. सदरील नियमांचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार जिल्ह्यात कोविड लसीकरण सुरू झाले असून, ६० वर्षांवरील लाभार्थी व विशेष आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. शासकीय व खासगी अशा ४० केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरणदरम्यान लस देण्यात येत आहे. नागरिकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करून कोविड लस घ्यावी, असे आवाहन कदम यांनी केले आहे.

बॉक्स

रविवारीही लसीकरण सुरू

जिल्हा रुग्णालय आणि टीबी रुग्णालय भंडारा, आरोग्यवर्धिनी केंद्र गणेशपूर, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी (ता. तुमसर) या ठिकाणी रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे. कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. कोविड या संसर्गजन्य आजाराची तपासणी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तसेच लक्षण जाणवणाऱ्या प्रत्येकाने कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जवळच्या टेस्टिंग केंद्रावर जाऊन चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

बॉक्स

तीन लक्ष ३४ हजारांचा दंड वसूल

२१ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून जिल्ह्यात तीन लाख ३४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक दंड मास्क न वापरणाऱ्या १७४१ नागरिकांकडून वसूल करण्यात आला.

बॉक्स

रात्रीची संचारबंदी

जिल्ह्यात १४ मार्चपासून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावलेला नसल्यास त्यांना मास्क लावल्याशिवाय वस्तू देऊ नये, असे आवाहन त्यांनी दुकानदारांना केले. ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हे धोरण अवलंबावे, असे ते म्हणाले. नियमांचे पालन न करणारे लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल, व्यापारी प्रतिष्ठान तसेच मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.