लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत. या हंगामात पथकाची करडी नजर आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठा दर्जेदार नसल्यास व भेसळ असल्यास बियाणे उगवणीबाबत तक्रारीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती शासनाने स्थापन केलेली आहे. बियाणे, खतांबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी, असे कृषी विभागाने कळविले आहे. संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
भरारी पथकेबियाणे, खते खरेदीत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर पथक गठित करण्यात आलेले आहे. या पथकांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे कृषी केंद्रचालकांनी नियमांचे उल्लंघन करू नये.
करण्यात आल्या कारवायाभरारी पथकाने यंदाच्या हंगामात कारवाया केलेल्या आहेत. यात कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.