शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मनातील कटुता कमी झाली तर समाजात आनंदाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:58 IST

अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देसीईओ रवींद्र जगताप म्हणतात,

भंडारा : अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड बोला, गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना रविंद्र जगताप म्हणाले, लोकांना आनंद कसा देता येईल, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा अधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्थ कर्मचाºयांना कटू बोलावे लागते. त्यामागील भूमिका ही केवळ समाजाचे काम तात्काळ व्हावे ही असते. त्यामुळे कटू बोलण्यामागील भूमिका समजून घेतली आणि मनातील कटूता कायमची हद्दपार केली तर समाजात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मकरसंक्रातीच्या काळात तिळगूळ देऊन गोड बोला असे म्हटले जाते. तीळ शारीरिक वृध्दी करते. स्निग्धता वाढविते. या सणातून मनाचीही स्निग्धता वाढवावी. गोड बोलण्याने अनेकदा काम हलके होते. पंरतू त्यातून कामाप्रति निष्ठा असणे गरजेचे आहे, असे रवींद्र जगताप यांनी सांगितले. सण उत्सव साजरे करताना एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे.सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सण उत्सवांचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन घेता येतो. मकरसंक्रात हा सण तर थेट गोड बोलण्याचा सल्ला देतो. या सणापासून प्रत्येकाने काही तरी शिकले पाहिजे आणि समाजात आनंदाची पेरणी करता आली पाहिजे, असे जगताप म्हणाले.