शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मनातील कटुता कमी झाली तर समाजात आनंदाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:58 IST

अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देसीईओ रवींद्र जगताप म्हणतात,

भंडारा : अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले.मकरसंक्रातीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड बोला, गोड बोला’ अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना रविंद्र जगताप म्हणाले, लोकांना आनंद कसा देता येईल, याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा अधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्थ कर्मचाºयांना कटू बोलावे लागते. त्यामागील भूमिका ही केवळ समाजाचे काम तात्काळ व्हावे ही असते. त्यामुळे कटू बोलण्यामागील भूमिका समजून घेतली आणि मनातील कटूता कायमची हद्दपार केली तर समाजात आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मकरसंक्रातीच्या काळात तिळगूळ देऊन गोड बोला असे म्हटले जाते. तीळ शारीरिक वृध्दी करते. स्निग्धता वाढविते. या सणातून मनाचीही स्निग्धता वाढवावी. गोड बोलण्याने अनेकदा काम हलके होते. पंरतू त्यातून कामाप्रति निष्ठा असणे गरजेचे आहे, असे रवींद्र जगताप यांनी सांगितले. सण उत्सव साजरे करताना एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे.सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सण उत्सवांचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन घेता येतो. मकरसंक्रात हा सण तर थेट गोड बोलण्याचा सल्ला देतो. या सणापासून प्रत्येकाने काही तरी शिकले पाहिजे आणि समाजात आनंदाची पेरणी करता आली पाहिजे, असे जगताप म्हणाले.