शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

वाघांच्या अधिवासासाठी आदर्श नवेगाव-नागझिरा अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. ...

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. घनदाट जंगल आणि मानवी हस्तक्षेेप नसलेला हा प्रदेश असल्याने येथे वाघांचा मुक्तसंचार असतो. नवेगाव-नागझिरा अभयारण्य म्हणजे वाघभूमी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. देशातील ४६ वा आणि राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जैवविविधतेत अव्वल दर्जा असलेला हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगाव आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा या व्याघ्र प्रकल्पांतर्गत समावेश आहे.

वाघाशिवाय जंगल संतुलित राहू शकत नाही आणि जंगलाशिवाय मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. ही बाब लक्षात आल्यावर वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत आठ वाघ असल्याची माहिती आहे. अनेकदा या वाघांचे दर्शनही होते. वीरू, जय, राष्ट्रपती, डेंडू या वाघांनी या अभयारण्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. वाघांची संख्या विदर्भात वाढत असताना या अभयारण्यातही आता वाघांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विपुल वनसंपदा असून, घनदाट जंगलात बिबट्या, रानकुत्री, अस्वल, सांबर, चितळ, नीलघोडा, गव्हा यासह मोर, रानकोंबडी, मत्स्य गरुड असे विविध प्रजातीचे प्राणी आहेत. यासोबतच सरपटणारे जीव आणि कीटक आहेत. निसर्गप्रेमींसाठी नवेगाव-नागझिरा प्रकल्प पर्वणी असते. मात्र, गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन ठप्प झाले होते. याचा परिणाम लगतच्या गावांवरही झाल्याचे दिसून येते. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात जंगलाकडे कुणीही फिरकले नाही. मात्र, वन्यजीव विभागाने या जंगलाची देखभाल योग्य प्रकारे राखली. साकोली तालुक्यातील पिटेझरी गेट पर्यटकांना नेहमी खुणावत असते. पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते.

जय-वीरू वाघांची प्रसिद्ध जोडी

नवेगाव-नागझिरा आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभयारण्यात मुक्तसंचार असलेल्या जय आणि वीरू या देखण्या व रुबाबदार वाघांनी या दोन्ही अभयारण्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. या वाघांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईपासून पर्यटक येत होते. मात्र, जय अचानक बेपत्ता झाला. पाठोपाठ वीरूही दिसेनासा झाला आणि पर्यटक निराश झाले.

व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वनक्षेत्रात वाढ झाली आहे. गस्तही वाढली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांची सोय आहे. अधिकाऱ्यांची करडी नजर असते. पाण्याची मुबलकता आणि पाणवठ्यांची योग्य देखभाल यामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्यात जैवविविधता पाहावयास मिळते. आता वाघाच्या अधिवासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे.

-विनोद भोवते,

अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक