शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या अधिवासासाठी आदर्श नवेगाव-नागझिरा अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. ...

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. घनदाट जंगल आणि मानवी हस्तक्षेेप नसलेला हा प्रदेश असल्याने येथे वाघांचा मुक्तसंचार असतो. नवेगाव-नागझिरा अभयारण्य म्हणजे वाघभूमी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. देशातील ४६ वा आणि राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जैवविविधतेत अव्वल दर्जा असलेला हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगाव आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा या व्याघ्र प्रकल्पांतर्गत समावेश आहे.

वाघाशिवाय जंगल संतुलित राहू शकत नाही आणि जंगलाशिवाय मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. ही बाब लक्षात आल्यावर वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत आठ वाघ असल्याची माहिती आहे. अनेकदा या वाघांचे दर्शनही होते. वीरू, जय, राष्ट्रपती, डेंडू या वाघांनी या अभयारण्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. वाघांची संख्या विदर्भात वाढत असताना या अभयारण्यातही आता वाघांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विपुल वनसंपदा असून, घनदाट जंगलात बिबट्या, रानकुत्री, अस्वल, सांबर, चितळ, नीलघोडा, गव्हा यासह मोर, रानकोंबडी, मत्स्य गरुड असे विविध प्रजातीचे प्राणी आहेत. यासोबतच सरपटणारे जीव आणि कीटक आहेत. निसर्गप्रेमींसाठी नवेगाव-नागझिरा प्रकल्प पर्वणी असते. मात्र, गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन ठप्प झाले होते. याचा परिणाम लगतच्या गावांवरही झाल्याचे दिसून येते. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात जंगलाकडे कुणीही फिरकले नाही. मात्र, वन्यजीव विभागाने या जंगलाची देखभाल योग्य प्रकारे राखली. साकोली तालुक्यातील पिटेझरी गेट पर्यटकांना नेहमी खुणावत असते. पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते.

जय-वीरू वाघांची प्रसिद्ध जोडी

नवेगाव-नागझिरा आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभयारण्यात मुक्तसंचार असलेल्या जय आणि वीरू या देखण्या व रुबाबदार वाघांनी या दोन्ही अभयारण्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. या वाघांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईपासून पर्यटक येत होते. मात्र, जय अचानक बेपत्ता झाला. पाठोपाठ वीरूही दिसेनासा झाला आणि पर्यटक निराश झाले.

व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वनक्षेत्रात वाढ झाली आहे. गस्तही वाढली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांची सोय आहे. अधिकाऱ्यांची करडी नजर असते. पाण्याची मुबलकता आणि पाणवठ्यांची योग्य देखभाल यामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्यात जैवविविधता पाहावयास मिळते. आता वाघाच्या अधिवासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे.

-विनोद भोवते,

अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक