शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

वाघांच्या अधिवासासाठी आदर्श नवेगाव-नागझिरा अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. ...

साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. घनदाट जंगल आणि मानवी हस्तक्षेेप नसलेला हा प्रदेश असल्याने येथे वाघांचा मुक्तसंचार असतो. नवेगाव-नागझिरा अभयारण्य म्हणजे वाघभूमी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. देशातील ४६ वा आणि राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जैवविविधतेत अव्वल दर्जा असलेला हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगाव आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा या व्याघ्र प्रकल्पांतर्गत समावेश आहे.

वाघाशिवाय जंगल संतुलित राहू शकत नाही आणि जंगलाशिवाय मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. ही बाब लक्षात आल्यावर वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत आठ वाघ असल्याची माहिती आहे. अनेकदा या वाघांचे दर्शनही होते. वीरू, जय, राष्ट्रपती, डेंडू या वाघांनी या अभयारण्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. वाघांची संख्या विदर्भात वाढत असताना या अभयारण्यातही आता वाघांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विपुल वनसंपदा असून, घनदाट जंगलात बिबट्या, रानकुत्री, अस्वल, सांबर, चितळ, नीलघोडा, गव्हा यासह मोर, रानकोंबडी, मत्स्य गरुड असे विविध प्रजातीचे प्राणी आहेत. यासोबतच सरपटणारे जीव आणि कीटक आहेत. निसर्गप्रेमींसाठी नवेगाव-नागझिरा प्रकल्प पर्वणी असते. मात्र, गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन ठप्प झाले होते. याचा परिणाम लगतच्या गावांवरही झाल्याचे दिसून येते. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात जंगलाकडे कुणीही फिरकले नाही. मात्र, वन्यजीव विभागाने या जंगलाची देखभाल योग्य प्रकारे राखली. साकोली तालुक्यातील पिटेझरी गेट पर्यटकांना नेहमी खुणावत असते. पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते.

जय-वीरू वाघांची प्रसिद्ध जोडी

नवेगाव-नागझिरा आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभयारण्यात मुक्तसंचार असलेल्या जय आणि वीरू या देखण्या व रुबाबदार वाघांनी या दोन्ही अभयारण्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. या वाघांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईपासून पर्यटक येत होते. मात्र, जय अचानक बेपत्ता झाला. पाठोपाठ वीरूही दिसेनासा झाला आणि पर्यटक निराश झाले.

व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वनक्षेत्रात वाढ झाली आहे. गस्तही वाढली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांची सोय आहे. अधिकाऱ्यांची करडी नजर असते. पाण्याची मुबलकता आणि पाणवठ्यांची योग्य देखभाल यामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्यात जैवविविधता पाहावयास मिळते. आता वाघाच्या अधिवासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे.

-विनोद भोवते,

अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक