शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

सुखसंपन्न महाराष्ट्र घडवीन

By admin | Updated: October 5, 2014 22:59 IST

जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून

भंडाऱ्यात प्रचारसभा : उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहनभंडारा : जीवनात संकटे येत असतात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. घाबरायचे नसते. शिवसेना प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. त्यामुळे राज्यात कुणाची लाट आहे, हे येत्या १५ तारखेला मतदानातून दाखवूनच द्या, असे सांगून सुखसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेने योजना आखली आहे. या योजना तुम्हाला देणार आहे, परंतु ते मिळवायचे की नाही, हे आता तुम्हाला ठरवायचे आहे, त्यामुळे राज्यात शिवसेनेला सत्ता द्या, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.भंडारा येथे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ.दीपक सावंत, भंडारा जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, उपजिल्हाप्रमुख सुनिल कुरंजेकर, लवकुश निर्वाण, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मला भारनियमनमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी द्यायची, बेरोजगारांच्या हाताला काम कसे द्यायचे, विद्यार्थ्यांना ओझेमुक्तीसाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, अशा संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी योजना तयार केली आहे. त्या मुलींचा मृत्यू गूढचमुरमाडीत तीन मुलींचा गूढ मृत्यू झाला. गेलेला जीव परत येणार नाही. परंतु मृत्यू कसा झाला हे सांगायला आघाडी सरकार तयार नाही. शेवटी सरकार म्हणते, त्या मुलींचा मृत्यू पाण्यात पाय घसरुन झाला. तुम्ही सांगा, या सरकारने महिलांना सुरक्षा दिली की वाऱ्यावर सोडले. गरीब जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना हाकलून लावण्याची वेळ आली आहे. युती का तुटली माहीत नाहीराज्यात २५ वर्षांपासून युती आहे. अचानक युती का तोडली हे सांगायला ‘ते’ तयार नाहीत. ३४ जागा अतिरिक्त मागितल्या. कशा देणार एवढ्या जागा. आजवर माझ्या शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. त्यांच्या हक्काची जागा सोडून देऊन ‘त्यांना’ खुष करायचे, माझ्या शिवसैनिकांशी प्रतारणा करायची, हे कुणी सांगितलं. आजवर संकटकाळात शिवसेनेची गरज होती आणि आता ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ असे करणाऱ्यांना जनता माफ करणार, नाही. राज्यात आम्ही २८७ जागा लढत आहोत. बीडमध्ये एक जागा सोडलेली आहे. मुंडे-ठाकरे कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही ते जपले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)