शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गाच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:45 IST

देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन मार्गांचा समावेशनियमांची सर्रास पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. त्या मानाने वृक्षांची लागवड व संगोपनाकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.पूर्व विदर्भातील एकटा भंडारा जिल्ह्यात तीन राज्यमार्गांचा दर्जा वाढवून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यात रामटेक-गोंदिया, भंडारा आरोली मार्गे रामटेके आणि भंडारा ते पवनी या राज्यमार्गांचा समावेश आहे. जवळपास २१० किलोमिटर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी जुनी व मोठी वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. विशेषत: रामटेक ते भंडारा व भंडारा ते पवनी शहराला लागून असलेल्या निलज फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील वृक्ष संपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. विशेष म्हणजे काही पर्यावरण पे्रमींनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर भंडारा पवनी राज्यमार्गावरील काही ठिकाणची मोठी व जुनी झाडे कापण्यात येणार नाही, अशी भुमिका घेण्यात आली. मात्र अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. असाच प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील लाखनी ते किटाडी मार्गे जोडणाºया अड्याळपर्यंतच्या मार्गावरही येत आहे. या शिवाय करडी-पालोरा ते पालांदूर मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याप्रमाणात मात्र रोपांची लागवड व संगोपनाबाबत बांधकाम करणाºया कंपन्यांचे धोरण उदासिनपणाचे आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने जमीनीची धुप वाढून त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल असी भीतीही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पूर्व विदर्भातील जवळपास पाच रस्त्यांचे विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. त्यापैकी तीन रस्त्यांना महामार्गाचा दर्जा दिल्या नंतर त्या मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. यावर वेळीच दखल घेवून पावसाळ्यात या मार्गांवर रोपांची लागवड व संगोपन करणे नितांत गरजेचे आहे.मो. सईद शेखपर्यावरण अभ्यासक, भंडारा

टॅग्स :environmentवातावरण