शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

राज्यमार्गाच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:45 IST

देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन मार्गांचा समावेशनियमांची सर्रास पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशभरातील रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु असून त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांना जोडणाऱ्या व महामार्गाशी सलग्नित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणात शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. त्या मानाने वृक्षांची लागवड व संगोपनाकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.पूर्व विदर्भातील एकटा भंडारा जिल्ह्यात तीन राज्यमार्गांचा दर्जा वाढवून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यात रामटेक-गोंदिया, भंडारा आरोली मार्गे रामटेके आणि भंडारा ते पवनी या राज्यमार्गांचा समावेश आहे. जवळपास २१० किलोमिटर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी जुनी व मोठी वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. विशेषत: रामटेक ते भंडारा व भंडारा ते पवनी शहराला लागून असलेल्या निलज फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील वृक्ष संपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. विशेष म्हणजे काही पर्यावरण पे्रमींनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर भंडारा पवनी राज्यमार्गावरील काही ठिकाणची मोठी व जुनी झाडे कापण्यात येणार नाही, अशी भुमिका घेण्यात आली. मात्र अन्य मार्गांवर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. असाच प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील लाखनी ते किटाडी मार्गे जोडणाºया अड्याळपर्यंतच्या मार्गावरही येत आहे. या शिवाय करडी-पालोरा ते पालांदूर मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्याप्रमाणात मात्र रोपांची लागवड व संगोपनाबाबत बांधकाम करणाºया कंपन्यांचे धोरण उदासिनपणाचे आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याने जमीनीची धुप वाढून त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल असी भीतीही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पूर्व विदर्भातील जवळपास पाच रस्त्यांचे विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. त्यापैकी तीन रस्त्यांना महामार्गाचा दर्जा दिल्या नंतर त्या मार्गावरील मोठी झाडे तोडण्यात आली आहे. यावर वेळीच दखल घेवून पावसाळ्यात या मार्गांवर रोपांची लागवड व संगोपन करणे नितांत गरजेचे आहे.मो. सईद शेखपर्यावरण अभ्यासक, भंडारा

टॅग्स :environmentवातावरण