शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शेकडो कुटुंबीय घरकुलापासून वंचितउद्दिष्ट ३१९५ घरकुलांचे : बेघर कुटुंबांना मिळाला आधार

By admin | Updated: May 16, 2015 01:02 IST

प्रतीक्षा यादीतील दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटूंबाना आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने ३ हजार १९५ घरकुलांचे उद्दिष्ट ...

लाखांदूर : प्रतीक्षा यादीतील दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटूंबाना आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने ३ हजार १९५ घरकुलांचे उद्दिष्ट लाखांदूर तालुक्याला दिले या घरकुलासाठी निधीही उपलब्ध करुन दिला. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी अजूनही घरकूल बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून घरकुलासाठी केंद्र वाटप शासनाकडून अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाकडून यासाठी ७५ टक्केप्रमाणे ५६ हजार २५० रुपये तर राज्य शासनाकडून २५ टक्के या प्रमाणात १८ हजार ५५० व राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान म्हणून २५ हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. तर पाच हजार रुपये लाभार्थी हिस्सा राहणार आहे.लाखांदूर तालूक्यात एकुण ३१९५ इतके या योजनेसाठी पात्र कुटुंबे होते. सन २००९-२०१० ला १८३ लाभार्थ्यांना अनुदान देऊन घरकुलाचा लाभ देण्यात आला होता. सन २०१०-११ ला २०२, २०११-१२ ला २२३, २०१२-१३ ला २३६, २०१३-१४ ला ४९ तर सन २०१४-१५ ला ५९१ घरकुल बांधकामाचे समोर ठेवण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी सुरु केलेली ही योजना चांगली असून या योजनेतून ग्रामीण भागातील वंचिताना घरे मिळाली आहेत. गेल्या १० वर्षात या योजनेतून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तोकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना किमान राहण्यापुरते घर उभारणे आव्हानाचे ठरत आहे. बांधकाम खर्चात झपाट्याने वाढ झाल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना किमान दोन लक्ष रुपये अनुदान केंद्र व राज्य शासनाने द्यावेत, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे. शासनाकडून देण्यात येणारा निधीच तोकडा असल्याने यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाचे काम देयके उशिरा मिळात असल्याने अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे चालू वर्षात तरी किमान शासनाने अनुदान वाढ करुन ग्रामीण भागातील निराधार कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. इतर जिल्ह्यात शासन निर्णयानुसार प्रति घरकूल एक हजार मानधनावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन घरकूल बांधकामासाठी तसेच शासकीय कामकाजासाठी निवड केली जाते. भंडारा जिल्ह्यात या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने मोजक्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)