शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो कुटुंबीय घरकुलापासून वंचितउद्दिष्ट ३१९५ घरकुलांचे : बेघर कुटुंबांना मिळाला आधार

By admin | Updated: May 16, 2015 01:02 IST

प्रतीक्षा यादीतील दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटूंबाना आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने ३ हजार १९५ घरकुलांचे उद्दिष्ट ...

लाखांदूर : प्रतीक्षा यादीतील दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटूंबाना आधार मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने ३ हजार १९५ घरकुलांचे उद्दिष्ट लाखांदूर तालुक्याला दिले या घरकुलासाठी निधीही उपलब्ध करुन दिला. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी अजूनही घरकूल बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून घरकुलासाठी केंद्र वाटप शासनाकडून अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाकडून यासाठी ७५ टक्केप्रमाणे ५६ हजार २५० रुपये तर राज्य शासनाकडून २५ टक्के या प्रमाणात १८ हजार ५५० व राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान म्हणून २५ हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. तर पाच हजार रुपये लाभार्थी हिस्सा राहणार आहे.लाखांदूर तालूक्यात एकुण ३१९५ इतके या योजनेसाठी पात्र कुटुंबे होते. सन २००९-२०१० ला १८३ लाभार्थ्यांना अनुदान देऊन घरकुलाचा लाभ देण्यात आला होता. सन २०१०-११ ला २०२, २०११-१२ ला २२३, २०१२-१३ ला २३६, २०१३-१४ ला ४९ तर सन २०१४-१५ ला ५९१ घरकुल बांधकामाचे समोर ठेवण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी सुरु केलेली ही योजना चांगली असून या योजनेतून ग्रामीण भागातील वंचिताना घरे मिळाली आहेत. गेल्या १० वर्षात या योजनेतून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तोकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना किमान राहण्यापुरते घर उभारणे आव्हानाचे ठरत आहे. बांधकाम खर्चात झपाट्याने वाढ झाल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना किमान दोन लक्ष रुपये अनुदान केंद्र व राज्य शासनाने द्यावेत, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे. शासनाकडून देण्यात येणारा निधीच तोकडा असल्याने यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाचे काम देयके उशिरा मिळात असल्याने अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे चालू वर्षात तरी किमान शासनाने अनुदान वाढ करुन ग्रामीण भागातील निराधार कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. इतर जिल्ह्यात शासन निर्णयानुसार प्रति घरकूल एक हजार मानधनावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन घरकूल बांधकामासाठी तसेच शासकीय कामकाजासाठी निवड केली जाते. भंडारा जिल्ह्यात या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने मोजक्या कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)