शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पीक नुकसानीची शेकडो प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: December 15, 2014 22:50 IST

कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी,

भंडारा : कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सादर केलेले प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उमेरड कऱ्हांडला अभयारण्य, भंडारा तालुक्यात कोका तर साकोली तालुक्यात न्यू नागझिरा अभयारण्य आहे. याशिवाय अड्याळ, तुमसर, मोहाडी, लाखांदूर या तालुक्यातही घनदाट जंगल असून या जंगलात हरिण, काळवीट, रानडुक्कर, नीलगायींचा समावेश आहे. या प्राण्यांच्या धुमाकुळात पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावापैकी बहुतांश प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत.लाखांदूर, पवनी, साकोली, तुमसर या चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. अभयारण्यात काळविटांसह नीलगाय, रानडुक्कर, तडस, कोल्हा, रानमांजर, ससे, मोर, सायाळ, मुंगूस, मसन्याऊ द आदींचे पर्यटकांना दर्शन घडते. पवनी तालुक्यातही या प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. जंगली भागातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. याशिवाय शेतशिवारात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. या वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यात कायद्याचे उल्लघंन होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागते. वन्यप्राण्यांच्या जीवाला हानी पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे स्वत:च्या पिकांचे रक्षण करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. त्यातच रानडुकरासारख्या प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी पिकांचे राखण करण्यासाठी जात नाहीत. यावर्षात पवनी तालुक्यात शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही प्रस्ताव मंजूर झाले, तर बरेच प्रस्ताव नियमात बरसत नाही, या कारणावरुन फेटाळण्यात आले. शासनाने केलेल्या कायद्यामुळे वन्यप्राण्यांकडून रितसर पंचनामा करण्यात येतो आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. एकंदरीत स्थिती पाहता विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे विविध पुरावे सादर करावे लागतात आणि ते करूनही त्यांना आवश्यक त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. (शहर प्रतिनिधी)