शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानीची शेकडो प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: December 15, 2014 22:50 IST

कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी,

भंडारा : कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी सादर केलेले प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उमेरड कऱ्हांडला अभयारण्य, भंडारा तालुक्यात कोका तर साकोली तालुक्यात न्यू नागझिरा अभयारण्य आहे. याशिवाय अड्याळ, तुमसर, मोहाडी, लाखांदूर या तालुक्यातही घनदाट जंगल असून या जंगलात हरिण, काळवीट, रानडुक्कर, नीलगायींचा समावेश आहे. या प्राण्यांच्या धुमाकुळात पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावापैकी बहुतांश प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत.लाखांदूर, पवनी, साकोली, तुमसर या चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. अभयारण्यात काळविटांसह नीलगाय, रानडुक्कर, तडस, कोल्हा, रानमांजर, ससे, मोर, सायाळ, मुंगूस, मसन्याऊ द आदींचे पर्यटकांना दर्शन घडते. पवनी तालुक्यातही या प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. जंगली भागातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. याशिवाय शेतशिवारात घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. या वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यात कायद्याचे उल्लघंन होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागते. वन्यप्राण्यांच्या जीवाला हानी पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे स्वत:च्या पिकांचे रक्षण करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. त्यातच रानडुकरासारख्या प्राण्यांकडून हल्ला होण्याच्या भीतीने अनेक शेतकरी पिकांचे राखण करण्यासाठी जात नाहीत. यावर्षात पवनी तालुक्यात शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला मिळावा यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही प्रस्ताव मंजूर झाले, तर बरेच प्रस्ताव नियमात बरसत नाही, या कारणावरुन फेटाळण्यात आले. शासनाने केलेल्या कायद्यामुळे वन्यप्राण्यांकडून रितसर पंचनामा करण्यात येतो आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. एकंदरीत स्थिती पाहता विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे विविध पुरावे सादर करावे लागतात आणि ते करूनही त्यांना आवश्यक त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. (शहर प्रतिनिधी)