शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मानव मिशनची बस येते सकाळी, शाळा भरते दुपारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST

मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात.

ठळक मुद्देमुलींची गैरसोय : शाळा सकाळ सत्रात सुरू करण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : मानव विकासअंतर्गत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस सकाळी धावू लागल्या आहेत. तथापि, काही शाळा दुपार सत्रात भरतात. त्यामुळे मुलींना दुपारच्या शाळेत लांब अंतरावरून पायपीट करीत शाळेत यावे लागत आहे. तथापि सर्व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात सुरू करण्यात यावा, अशी मागणी मोहाडी मुख्याध्यापक संघाने केली आहे.मानव विकास योजनेमार्फत मुलींना शाळेत येण्यासाठी मोफत प्रवासाची सोय करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील ३९ शाळांमधील सुमारे ९७८ मुली मानव विकास बसद्वारे तुमसर - बेटाळा, तुमसर -हरदोली -आंधळगाव, तुमसर - आंधळगाव -कांद्री, तुमसर - किसनपूर, तुमसर -खडकी, तुमसर - बोंडे, तुमसर - धोप -आंधळगाव या मार्गावरील शाळेत येत असतात. मार्च महिन्यापासून तुमसर बस स्थानकवरून मानव विकास योजनेच्या बसेस मुलींना शाळेत आणण्यासाठी सकाळी येत आहेत.मोहाडी तालुक्यात दहावीचे परीक्षा केंद्र असणाऱ्या सर्व शाळा सकाळ सत्रात भरत आहेत. त्यामुळे काही मुख्याध्यापकांनी तुमसर आगार प्रमुखांना सकाळ सत्रात बस सुरू करण्याची मागणी केली. त्या विनंतीनुसार सकाळ सत्रात बसेस येत आहेत. काही ज्या शाळेत परीक्षा केंद्र नाहीत अशा बहुतेक शाळा दुपार सत्रातत भरत आहेत. त्यामुळे मुलींना शाळेत येण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. मानव विकास योजनेच्या बसेस सकाळी सुरू करण्यात आल्या याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. मानव विकास बसच्या दळणवळणबाबत शिक्षण विभाग व तुमसर आगार प्रमुख संवादाचा अंतर पडल्याने काही शाळेतील मुलींच्या शाळेत येण्याजाण्या प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. प्रत्येक शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, सहायक केंद्रसंचालक, सहायक परीरक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करण्यासाठी दहावीच्या पेपरच्या दिवशी शिक्षक जात आहेत. तसेच मार्च महिन्यात वेगवेगळे प्रशिक्षण होत आहेत. याचा प्रभाव शाळांवर पडला आहे. या समस्येविषयी शिक्षण विभागाला कल्पना आहे. असे प्रश्न निर्माण झाले अनेक शाळा सकाळ की दुपारच्या सत्रात सुरू ठेवायच्या या कोंढीत सापडले आहेत. तरी सर्व माध्यमिक शाळा सकाळ पाळीत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कडे केली आहे. गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे यांचे मार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांना मुख्याध्यापक संघ अध्यक्ष गोपाल बुरडे, सचिव राजू बांते, राजू भोयर, सहसराम गाडेकर, अतुल बारई, सिंधू गहाने, कमल कटारे, सुनीता तोडकर, दिगंबर राठोड, यशोदा येळने, विनोद नागदेवे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी